साताऱ्यात तेराव्या फेरीनंतर श्री.छ.खा उदयनराजेंना सापडला विजयाचा मार्ग…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यात तेराव्या फेरीनंतर श्री.छ.खा उदयनराजेंना सापडला विजयाचा मार्ग…
सातारा दि: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या ४५- सातारा लोकसभा मतदारसंघात १६ उमेदवार होते. त्यापैकी महायुती व महाविकास आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट पुरस्कृत उमेदवार अशा तीन उमेदवारांमध्ये चांगली लढत झाली यामध्ये तेराव्या मतमोजणी फेरीनंतर महायुतीचे उमेदवार श्री छ उदयनराजे भोसले यांना विजयाचा मार्ग सापडला त्यांना एकूण पाच लाख ७१ हजार १३४ तर त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शशिकांत शिंदे यांना पाच लाख ३८ हजार३६३ तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे पुरस्कृत संजय गाडे यांना ३७ हजार ६२ मते मिळाली. यामध्ये उमेदवार पसंत नसलेल्या नोटासाठी ५६२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूणच या अटीतटीच्या निवडणुकीत श्री छ खा भोसले यांचा ३२ हजार७७१ मताने विजयी झाल्याची घोषणा सायंकाळी करण्यात आली.
तसेच त्यांना सातारा जिल्हा अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री जितेंद्र दुडी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. सातारा येथील औद्योगिक वसाहती मधील शासकीय गोदाम या ठिकाणी सातारा लोकसभा मतदारसंघासाठी स्वातंत्ररित्या सहा विधानसभा मतदार संघाची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू करण्यात आली.
सुरुवातीला उमेदवारांचे प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व ईव्हीएम यंत्रणा आणण्यात आल्या. यासाठी वेगवेगळे पद्धतीने कोतवाल यांना ड्रेस कोड देण्यात आले होते. तसेच सर्व ईव्हीएम यंत्रणेसाठी विशेष कॅमेरा व निवडणूक अधिकाऱ्यांसोबतच वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांनी मतमोजणीला सुरुवात केली
आठ वाजून ४५ मिनिटांनी पहिल्या फेरीचे मतमोजणी पूर्ण होऊन सुरुवातीलाच महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी आघाडी घेतली. ही आघाडी थेट तेरा फेरीपर्यंत कायम राहिल्यामुळे सातारा शहर व परिसरात शांततेचे वातावरण होते एवढेच नव्हे तर अनेक प्रसारमाध्यमचे प्रतिनिधी यांनी सुद्धा या मतमोजणी केंद्रामधील प्रिंट व मीडिया कक्षेमध्ये उत्सुकता ताणली गेली होती.
त्यानंतर तेराव्या फेरीमध्ये सातारा जावली विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात होताच महायुतीचे उमेदवार श्री छ खा भोसले यांना अपेक्षितरित्या मतमोजणी मध्ये आघाडी मिळाली. आणि सातारा शहरातील रस्ते गर्दीने फुलून जाण्या स सुरुवात झाली.
ही आघाडी २३ व्या फेरीपर्यंत कायम राहिली. मतमोजणीच्या दिवशी दुपारी साताऱ्यातशांतता व रस्त्यावर तुरळक गर्दी असताना अचानक श्री छ खा भोसले यांच्या विजयाची नांदी लागली .अनेक हौसे- नवसे- गवसे यांनी रस्त्यावर येऊन आनंद उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.
सातारा शहर परिसरात १४४ कलम व जमावबंदीचा आदेश तसेच वाद्य वाजवण्यास परवानगी नसतानाही मोठ्या प्रमाणात डी.जे व रस्त्यावर जे.सी.बी. आणून शिवतीर्थावर मोठी गर्दी झाली होती .या गर्दीला नियंत्रण करणे वाहतूक पोलीस व सातारा पोलिसांना अक्षरशा अपयश आले होते. याबाबत श्री छ खा उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी सुद्धा या विजयाबद्दल आनंद उत्सव साजरा केला. साताऱ्यातील झालेल्या गर्दी बाबत त्यांना विचारणा केली असता एवढ्या मोठ्या प्रमाणात जर गर्दी झाली असेल व त्यांनी जर मतदान केले असेल तर एक लाख मताधिक्याने उदयनराजे निवडून आले पाहिजे होते असे त्यांनी ठामपणे सांगितले.
शेवटी विजयला अनेक वाटा असतात. पण पराभवाला एकच वाट असते महाविकास आघाडीचे उमेदवार व प्रचारक यांनी चांगल्या पद्धतीने लढत दिली आहे. या स्मरणीय लढतीमुळे खऱ्या अर्थाने सातारा लोकसभा मतदारसंघाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले आहे. जय पराजय अपेक्षा साताऱ्यातील निवडणूक ही चांगलीच गाजली. महायुतीच्या चार आमदारांनी प्रामाणिकपणाने समर्थकांसोबत काम केल्यामुळे श्री छ खा भोसले यांचा मार्ग तेराव्या फेरीत सुरू झाला. त्यामुळे आमदार व त्यांच्या समर्थकांनी सुद्धा आनंदात सहभागी होण्यास सुरुवात केली. सातारा येथील या निवडणुकीचे खास वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना मतमोजणी मध्ये आघाडी मिळाल्यामुळे अति उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत आनंद उत्सव साजरा केला तर सायंकाळी विजयी उमेदवार श्री छ खा भोसले यांच्या समर्थकांनी रस्त्यावर येऊन मोठा जल्लोष केला विशेष म्हणजे महाराष्ट्रात प्रथमच जय पराजय झालेल्या उमेदवारांचा जल्लोष पाहून नेमकं काय घडले हे पाहण्यासाठी अनेकजण संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता मीडिया कक्षेमध्ये देशभरातील निकाल पहिल्या फेरीपासून समजत होते परंतु सातारा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी व त्याची माहिती लवकर मिळत नसल्याने अनेक जण आपापल्या सहकाऱ्यांना संपर्क साधून विचारणा करत होते अखेर सायंकाळी या निवडणुकीचे सर्व मतमोजणी पूर्ण झाली आणि कोणताही अनुचित प्रकरण घडल्यामुळे पोलीस यंत्रणेचा ही ताण कमी झाला. सदरची निवडणूक ही चांगलीच गाजली असली तरी याबाबतचे आता अनेकजण विश्लेषण करतील पण खऱ्या अर्थाने तिसऱ्या तिसऱ्या उमेदवाराची तुतारी ही या विजयाची शिल्पकार ठरल्याची ही चर्चा सुरू झालेली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे उमेदवार श्री संजय कोंडीबा गाडे यांच्यासह अनेक उमेदवारांना मते मिळाले असली तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत कदम यांना अवघी ११,९१२ मते मिळाल्यामुळे वंचितचा करिष्मा दिसून आला नाही. हे सुद्धा स्पष्ट झाले आहे.