फलटण:-फलटण तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, पिकांचं नुकसान.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

फलटण तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, पिकांचं नुकसान.

सातारा प्रतिनिधी विनोद पाटील
फलटण:- फलटण तालुक्यात गिरवी, धुमाळवाडी, बोडकेवाडी, जाधववाडा,निरगुडी,जावली,जिंती,आंदरुड परिसरातील भागात गुढीपाडव्याच्या दिवशी व नंतर दोन दिवस वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस अचानक झाला.शेतातील गहू, हरभरा,मका,,मेथी, कोथिंबीर, टोमॅटो,द्राक्षे, डाळिंब,आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला पिकांचे व फळबांगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.शेतकरी अचानक आलेल्या वादळीवाऱ्यासह गारांच्या पावसामुळे गोंधळून गेले.शेत शिवारात शेतकरी शेतमजूर यांची एकच ऐन गुढीपाडव्याच्या सणादिवशी धावपळ उडाली.तळवट घेऊन शेतात जाऊन शेतातील काढलेल्या गहूं हरभरा मका पिकांच्या साठवणूकीसाठी शेत शिवारातील शेतकरी शेतमजूर धावपळीत होते.सुगीच्या दिवसांत आलेल्या वादळीवाऱ्यासह गारांच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.यावर्षी दिवाळीच्या अगोदर अतिवृष्टीमुळे नुकसान झाले तर दिवाळी नंतर हातातोंडाशी आलेला घास वादळीवाऱ्यासह गारांच्या पावसामुळे हातातून निसटून गेला.अनेक शेतकऱ्यांना वादळीवाऱ्यासह गारांच्या पावसामुळे फटका बसला आहे.शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मधून होत आहे.
तातडीने पंचनामे केले तरच नुकसान भरपाई मिळेल यासाठी प्राधान्याने लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




