खटाव:-खटाव तालुक्यात वीर विधवा पत्नीला शासकीय जमिनीचा मिळणार दि ५ रोजी कब्जा पट्टा.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
खटाव तालुक्यात वीर विधवा पत्नीला शासकीय जमिनीचा मिळणार दि ५ रोजी कब्जा पट्टा.
वडूज दि: लष्करी कारवाईत वीरमरण आल्यास अशा जवानांच्या विधवा अधिकाऱ्यांच्या विधवा पत्नी किंवा त्यांच्या कायदेशीर वारसास निबा र्धारित्या जमीन प्रदान करण्याबाबत आदेश आहे. याची अंमलबजावणी दिनांक ५ ऑगस्ट रोजी वडूज येथील खटाव तहसील कार्यालयात होणार असल्याची माहिती खटावचे प्रभारी तहसीलदार अजितराव जंगम यांनी दिलेली आहे.
महसूल सप्ताह निमित्त एक ते सात ऑगस्ट निमित्त सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रलंबित कामे मार्गी लागलेले आहे .त्याचाच भाग म्हणून दिनांक ५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय या ठिकाणी आठ विधवा वीर पत्नींना शासनाने दिलेल्या जमिनीचा कब्जा पट्टी मिळणार असल्यामुळे त्यांच्यामध्ये समाधान पसरले आहे.
सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी ,प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, प्रभारी खटाव तहसीलदार अजितराव जंगम व नायब तहसीलदार महेश गायकवाड व महसूल सहाय्यक नौशाद मुल्ला यांच्या प्रयत्नाने या जमिनीच्या कब्जा पट्टा मिळत आहे. वडूज नगरी ही हुतात्म्याची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. बऱ्याच कालावधीनंतर वीर पत्नींना जमिनीचा कब्जा पट्टा मिळत आहे. त्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर , राष्ट्रीय काँग्रेसचे डॉ. महेश गुरव ,इम्रान बागवान व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष मयूर बनसोडे, तालुकाध्क्ष कुणाल गडांकुश, धनंजय चव्हाण, दत्ता केंगार यांनी महसूल यंत्रणेचे आभार मानले आहेत. वीर पत्नी सत्वशीला शिवाजी सावंत राहणार तासगाव तालुका जिल्हा सातारा ,नर्मदा जनार्दन कदम शनिवार पेठ सातारा, इंजाज मुनीर खान राहणार वऱ्ये तालुका जिल्हा सातारा, सुनिता अशोक सावंत राहणार विसावा नाका सातारा शहर ,वहिदा झाकीर हुसेन पठाण राहणार करंजे पेठ सातारा, सुमन एकनाथ माने राहणार सातेवाडी सुरवंता नानासाहेब पावणे राहणार कलेढोण तालुका खटाव या वीर पत्नीला खटाव तालुक्यातील धोंडेवाडी नडवळ, भूषण गड येथील प्रत्येकी पाच एकर जमिनीचा कब्जा पट्टा दिनांक 5 ऑगस्ट रोजी मान्यवरांचे उपस्थिती सुपूर्द करण्यात येणार आहे .बऱ्याच कालावधीनंतर शासनाने वीर पत्नींना शासकीय जमीन कब्जा पट्टी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल खऱ्या अर्थाने यंदाचा स्वातंत्र्य दिन हा वीर पत्नीचा बहुमान ठरणार आहे.
—-&-&———+——————————+
—————————————————-
फोटो – खटाव चे प्रभारी तहसीलदार अजितराव जंगम