खटाव – औंध:-वर्धन ॲग्रो देणार 3111 रुपये अंतिम उसदर मालक तोडीने येणाऱ्या उसाला प्रतिटन 4111 रुपये संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय.
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर
वर्धन ॲग्रो देणार 3111 रुपये अंतिम उसदर मालक तोडीने येणाऱ्या उसाला प्रतिटन 4111 रुपये संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय.
प्रतिनिधी खटाव , 1 डिसेंबर पासून वर्धन ॲग्रो कारखान्याकडे गाळपास येणाऱ्या उसाला प्रतिटन 3111 रुपये अंतिम दर देण्यात येणार आहे तसेच मालकतोडीच्या ऊसाला प्रतिटन अंतिम दर 4111 रुपये देणार असल्याचे वर्धन चेअरमन धैर्यशील कदम यांनी जाहीर केले आहे कारखाना कार्यस्थळावर चेअरमन धैर्यशील कदम यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत बैठक झाली यावेळी ज्येष्ठ संचालक भीमराव पाटील, संपतराव माने, भीमराव डांगे, सुदाम दीक्षित, सत्वशील कदम, सुनील पाटील, दीपक लिमकर, यशवंत चव्हाण , पृथ्वीराज निकम, अविनाश साळुंखे, सतीश सोलापूरे, दत्तात्रय साळुंखे, संतोष घाडगे, शरद चव्हाण, कार्यकारी संचालक विक्रमशील कदम आदी उपस्थित होते धैर्यशील कदम म्हणाले आजपर्यंत कारखान्यात गाळपासाठी आलेल्या उसाची बिले वेळेत वितरीत केली आहेत या पुढेही 1 डिसेंबर पासून येणाऱ्या उसाला प्रतिटन अंतिमदर 3111 रुपये तर मालकतोडीने येणाऱ्या उसाला ऊस तोडणी वाहतूक कमिशनसह 4111 रुपये अंतिम दर देण्यात येणार आहे तसेच उसाची बिले 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत झाला कारखाना परिसरातील सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी ऊस पुरवठादारानी आपला ऊस वर्धन कारखान्यास जास्तीत जास्त प्रमाणात पुरवठा करावा असे आवाहनही धैर्यशील कदम यांनी यावेळी केले सभासदामध्ये आनंदाचे वातावरण वर्धन कारखान्याने शेतकऱ्यांना उच्चतम दर देण्याचे धोरण अवलंबलेले आहे कारखान्याने सहवीज प्रकल्प नसताना सुद्धा उच्चांकी दर देण्याचा निर्णय जाहीर केला आहे त्यामुळे वर्धन ॲग्रो कारखान्याच्या सभासद ऊस पुरवठादार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.