खटाव:-शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये छोट्या कार्यकर्त्यांना प्राधान्य.
प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी अजित जगताप सातारा
शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये छोट्या कार्यकर्त्यांना प्राधान्य.
वडुज दि:
खटाव तालुका शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची बिनविरोध चर्चा पूर्ण थांबली असून आता दुरंगी लढतीसाठी उमेदवार सज्ज झालेले आहेत. सर्वसाधारण सोसायटी गटासाठी-७७ ग्रामपंचायत-२३ व्यापारी-१२ व हमाल मापाडी-९ अशा पद्धतीने उमेदवारी अर्ज आज शेवटच्या दिवशी माघारी घेतले .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच खटाव तालुका विकास आघाडी यांच्यामध्ये लढत होणार आहे.शेवटच्या दिवशी अर्ज माघारी घेण्यासाठी कार्यकर्त्यांवर काहींनी दबाव टाकले होते. तर काहींना साथ न लाभल्यामुळे अर्ज माघारी घेण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अर्ज मागे घेताना नाराजीचेही सुरू उमटले होते.
भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बाजार समितीच्या निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जुळवून घेतले तर खटाव विकास आघाडीच्या माध्यमातून पक्ष विरहित पण पक्षाशी निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांनी खटाव विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर केली. या निवडणुकीत खटाव तालुक्याचे लक्ष लागूनराहिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना विरोधी इतर पक्ष गट व इतर शेतकरी संघटना अशी लढत होणार आहे. सर्वच उमेदवार हे ग्रामीण भागातील नाळ असलेले असून माथाडी कामगारांना बिल्ला असल्याशिवाय त्यांना संधी देऊ नये अशी मागणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी करून खऱ्या अर्थाने बोगसगिरीवर वाचा फोडलेली आहे. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरलेले आहे. या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी द्यावी याबद्दल ठाम मत झाले असून काहींनी चांगली संधी मिळाली आहे. मायणी गटात -१०, औंध-१७, पूसेसावली-१९, बुध-२२, निमसोड-१२ असे संख्याबळ आहे. निवडणूक अधिकारी म्हणून सुषमा शिंदे, बाळासाहेब भोसले, स्वप्नील माळी यांनी काम पाहिले.
——————————————————-
फोटो – वडुज ता. खटाव येथील उपनिबंधक कार्यालयात झालेली गर्दी,,( छाया – सूरज पोतदार, वडुज,)