वाई:-कळंभे ता वाई येथे स्वातंत्र दिन उत्साहात संपन्न.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS
कळंभे ता वाई येथे स्वातंत्र दिन उत्साहात संपन्न.
स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामदैवत श्री मानाईदेवीची ग्रामपंचायत कळंभे यांचे वतीने प्रथम नागरिक सरपंच सौ निलम शिवथरे, आदर्श सरपंच सौ ज्योती गायकवाड,माजी सरपंच सौ सारीका गायकवाड, भावी उपसरपंच सौ शकुंतला चव्हाण यांनी भारतमातेच्या रूपात पुजा बांधली.तद्नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंभे चे विद्यार्थी व शिक्षक यांनी गावातुन प्रभातफेरी काढुन, भारतमातेच्या कपाळावरील स्वातंत्र्याचा ठसठसीत कुंकू अबाधित ठेवण्यासाठी बलिदान देणारे कळंभे गावचे सुपुत्र शहिद जवान शशिकांत शिवथरे यांचे स्मारक येथे अभिवादन केले.
त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय कळंभे येथिल हुतात्मा कोनशीला अभिवादन करून सरपंच सौ निलम शिवथरे यांचे ध्वजारोहन करण्यात आले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंभे येथील राष्ट्रीय ध्वजारोहन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंभेच्या मुख्याध्यापक सौ विनाया पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण केलेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आवेषपुर्ण देशभक्तीपर गीते, क्रांतीवीरांचे भाषणे केली.
तद्नंतर कळंभे गावचे शिक्षणप्रेमी व आदर्श शेतकरी सौ व श्री- कल्पना/ सुभाष दादू शिवथरे यांचे तर्फे स्वर्गीय प्रसाद सुभाष शिवथरे यांचे स्मारणार्थ इयत्ता पहिली ते चौथी चे सर्व मुलांना सुमारे ३६०००/- किंमतीचे उत्तम प्रतीचे २७ डेक्स भेट देण्यात आले. तसेच गावातील विकास सेवा सोसायटी, श्री.मानाई पतसंस्था,श्री मेरूलिंग दुध डेअरी, गावातील इतर शिक्षणप्रेमी नागरीकांच्या वतीने मुलांना शालेय उपयोगी साहित्य व खाऊ चे पुडे देण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंभे चे सर्व विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांना ग्रामपंचायत सरपंच सौ निलम शिवथरे,उपसरपंच श्री.आबाजी सुतार, ग्रामसेवक श्री प्रभुणे,आदर्श सरपंच सौ ज्योती गायकवाड,माजी सरपंच सौ सारीका गायकवाड,माजी उपसरपंच श्री प्रकाश बाबर,भावी उपसरपंच सौ शकुंतला चव्हाण,ग्रा.प.सदस्य श्री.संभाजी गायकवाड, कोतवाल सौ.भाग्यश्री वेदपाठक सर्व सदस्य यांचे वतीने बालगोपाळांची पगंत/ स्नेहभोजन देण्यात आले.
तरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंभे यांना वेळोवेळी सहकार्य, मदत करणारे सर्वांचे जाहीर आभार मानन्यात आले.
नागरिकांना अंत्यत महत्वाची सुचना-
ज्या नागरिकांनी दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी आपले घरावर राष्ट्रीय ध्वज तिरंगा चे ध्वजारोहन केले असेल त्यांनी आज सायंकाळी ६-०० वाजता दिवस मावळताना सदरील ध्वज सन्मानाने उतरवावा व त्याची जपणूक करून ठेवावी. कोठेही राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी.