शिरवळ:-शिरवळ प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक देसाई एकट्याच दोषी आहेत का?
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
शिरवळ प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक देसाई एकट्याच दोषी आहेत का?
शिरवळ दि: पुणे- बेंगलोर महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील शिरवळ ता. खंडाळा परिसर सध्या चांगलाच गाजत आहे. याला कारणही बरीच आहेत. पण, सध्या अल्पवयीन मुलीला त्रास दिल्याने तिने आत्महत्या केली. या कारणामुळे शिरवळ पोलीस ठाण्याचे महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांना तातडीने निलंबित केले आहे. हा पोलीस प्रशासनाचा भाग असला तरी या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक देसाई या एकट्याच दोषी आहेत का ? असा सवाल यानिमित्त उपस्थित केला जात आहे.
वास्तविक पाहता खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरात औद्योगिक वसाहत निर्माण झाल्यापासून छोटे-मोठे गुंड व त्यांना आश्रय देणारे प्रस्थापित मंडळी यांची अभद्र युती आहे . ती कधीही लपून राहिलेली नाही .याबाबत उघडपणाने चर्चा होत असली तरी त्याची दखल घ्यावी अशी यंत्रणा मूग गिळून गप्प होती. सध्या सातारा जिल्ह्यात दररोज कायदा व सुव्यवस्थेची दिंडोरी निघत आहेत.
सातारा पोलीस प्रशासन अथवा जिल्हा प्रशासनबाबत कोणालाही त्याचा धाक राहिलेला नाही. यातूनच मग असुरक्षिततेची भावना सर्वांच्या मध्ये निर्माण झालेली आहे. याच प्रमुख कारणातून खंडाळा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने स्वतःची जीवन यात्रा संपवून या प्रश्नाकडे सर्वांचेच लक्ष वेधून घेतलेले आहे. पोलीस यंत्रणेचे काम हे गुन्ह्याचा तपास करणे आहे. तर न्यायालयाचे काम हे गुन्हेगाराला शिक्षा करणे. त्यांना जामीन देणे. हे आहे याची माहिती शिरवळ परिसरातील अनेकांना आहे पण आता साप समजून भुई धोपटण्याचा प्रकार सुरू झालेला आहे. अशी चर्चा सुरू झालेली आहे.
मुळातच महाराष्ट्राचा विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली .आंदोलन, मोर्चे निघाले. अद्याप या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालेली नाही .आता या सर्व प्रकरणाचा लोकांना विसर पडलेला आहे. वास्तविक पाहता सातारा जिल्ह्यातील अनेक मुलींना संरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. हे अधोरेखित झालेले आहे. पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांनी आपल्या आठ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक बलात्कार व पोकसो कायदा वाबात योग्य रीतीने तपास करून पीडितांना न्याय मिळवून दिलेला आहे. असे असताना शिरवळच्या प्रकरणांमध्ये त्यांनी हलगर्जीपणा केला हा निष्कर्ष काढणे योग्य आहे का? अशी आता विचार ना होऊ लागलेले आहे.
खंडाळा तालुक्यातील सदर प्रकरणाचा आढावा घेतला तर ही घटना गेल्या महिन्यातील २९ नोव्हेंबरला घडली व ३० नोव्हेंबरला आरोपींना पकडून वाई सेशन कोर्टामध्ये न्यायमूर्तीसमोर हजर केले. त्यावेळेला यातील अल्पवयीन आरोपींना अटक करण्यापूर्वी त्यांना नोटीस दिली का ? तसेच इतर गोष्टींबाबत पोलीस तपास अधिकाऱ्याकडून वस्तूनिष्ठ माहिती आदरणीय न्यायालयाने घेतली होती. . त्यानंतर एक दिवस या आरोपींना पोलीस कोठडी व नंतर न्यायालय कोठडी दिली. हा न्यायव्यवस्थेचा भाग असला तरी वाई न्यायालयात असताना आरोपीने आपल्या वकिलामार्फत जमिनीचा अर्ज केला. त्यावेळेला अटी व शर्तीनुसार या आरोपींना जामीन झाला. या जामीनसाठी कागदपत्रांची पूर्तता करणारे,वकील व जामीनदार यांनी प्रयत्न केले. या घटनेमध्ये १६४ नुसार इन कॅमेरा पोलीस यंत्रणेने जाब जबाब नोंदवला. या सर्व घटनेनंतर सदर मुलीची दुर्दैवी आत्महत्या प्रकरण पुढे आले. या मुलीच्या आत्महत्येने प्रत्येकाला वेदना झाल्या. कोणतेही सुरक्षित गोष्टी न घडल्यामुळे या अल्पवयीन लेकराला जीवन यात्रा संपवावी लागली. बिचारी उमलण्या अगोदरच या जगातून नाहीसे व्हावे वाटले. याला कारणीभूत फक्त पोलीस यंत्रणा नसून समाज व्यवस्था ही आहे. हे नाकारून चालणार नाही.
जागोजागी ज्यावेळी अल्पवयीन मुलीशी काही मुलं संवाद साधत असताना आजूबाजूने ये जा करणारे कधीही त्यांना रोखत नाहीत. किंबहुना या गोष्टीची आपलं कोणतेही देणं घेणं नाही. अशी तटस्थ भूमिका घेतली जाते. आणि एखादी दुर्दैवी घटना अशी घडली की, मग समाज मनातील कार्यकर्ते जागे होतात. आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून अक्कल चालवतात . याबाबतही आता सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
शिरवळ पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी आरोपी अक्षय लांडगे व त्याचे दोन अल्पवयीन साथीदार अशा तिघांना ताब्यात घेतलेले आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांच्याकडे होता . तो काढून हा तपास आता स. पो. नि. केंद्रे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता त्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर हा तपास जर स. पो. नि. केंद्रे यांच्याकडे दिला असता तर सदर मुलीचा जीव वाचला असता का? पण, असे घडले नाही.
आता शिरवळ परिसरातील अनेक तथाकथित नेतेगण मंडळी सातारा पोलीस अधीक्षकांना भेटून अक्षय लांडगे व दोन आरोपी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरण गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केला आहे. वास्तविक पाहता सातारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न फार गंभीर बनलेला आहे. गुन्हेगार खुलेआम रस्त्यावर हत्यार नाचत आहेत. विना परवाना डी जी, जुगार, दारू अड्डा चालवत आहेत.वेगाने गाड्या फिरवत आहेत. एवढेच नव्हे तर खंडणीचा प्रकार सुद्धा मोठ्या प्रमाणात घडत आहे. याबाबत संघटना किंवा लोक आंदोलन करताना दिसत नाहीत.याची नोंद आता सर्वांनाच घ्यावी लागणार आहे. सर्वच गोष्टी पोलिसांनी हप्ते न घेता करावीत. व इतरांनी हाताची घडी तोंडावर बोट धरून राहावे. ही अपेक्षा योग्य नाही.
सातारा जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर तात्कालीन पोलीस अधीक्षक मीरा बोरवणकर, जिल्हा अधिकारी वंदना खुल्लर ,तुरुंग अधिकारी स्वाती साठे, माहिती अधिकारी वर्षा शेडगे, पोलीस उपअधीक्षक अर्चना त्यागी , आ डॉक्टर शालिनीताई पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ ज्योती जाधव अशी भली मोठी नाव कर्तबगार महिला लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांबाबत घेतली जात होती. त्यानंतर सातारा पोलीस अधीक्षक के एम प्रसन्ना व जिल्हाधिकारी रामास्वामी या बिगर मराठी अधिकाऱ्यांनी केलेले काम आजही दिशादर्शक ठरले आहे. मग अलीकडच्या काळातच असे का घडते? असा मार्मिक प्रश्न जेष्ठ नागरिक विचारू लागलेले आहेत.
छाया चित्र —
वृषाली देसाई