कराड:-योग्य नियोजन केल्यास शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन शक्य – मा.श्री शंतनु प्रल्हाद वाघ पाटील.
सह संपादक अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
सह संपादक अशितोष चव्हाण
योग्य नियोजन केल्यास शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन शक्य – मा.श्री शंतनु प्रल्हाद वाघ पाटील.
कराड:18 योग्य प्रकारे शेती न केल्यास, त्यात तंत्रज्ञानाचा वापर न केल्यास,पारंपारिक शेतीत नुकसान होते. म्हणून त्यासाठी नियोजन खूप महत्त्वाचे आहे.ऊस शेतीमध्ये जर योग्य नियोजन केले, कीटकनाशकाची ड्रोन द्वारे फवारणी केली, ड्रीपद्वारे योग्य खताचा पुरवठा केला तर एकरी 125 टन उत्पादन मिळू शकते म्हणून नियोजनपूर्वक शेती केली तर ती फायदेशीरच ठरते . नियोजन पूर्वक शेती करणारा शेतकरी कधीच आत्महत्या करत नाही. शेतामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला. जमिनीचे माती परीक्षण केले तर पीक हे उत्तम दर्जाचे येऊ शकते. असे प्रतिपादन प्रमुख वक्ते मा. श्री. शंतनू प्रल्हाद वाघ पाटील (प्रगतशील शेतकरी, पुसेगाव) यांनी वेणूताई चव्हाण कॉलेज कराडच्या, नडशी येथे होत असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या “विशेष श्रमसंस्कार शिबिरात” कृषी विषयक मार्गदर्शन या विषयावर बोलत असताना केले.
तसेच निचऱ्याची जमीन असेल तर आल्याचे उत्पादन चांगल्या प्रकारे येते. कोणत्याही पिकात नेहमी सातत्य महत्त्वाचे असते.त्यांनी विद्यार्थ्यांना व्यवसाय, नोकरी करत करत शेती करण्याचा सल्ला दिला. माणसाने पैसे कमावल्याशिवाय त्याला समाजात कोणीही विचारत नाही म्हणून प्रत्येकाने मेहनत केली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
तसेच प्रवीण जाधव यांनीही शेतीबद्दल मोलाचे असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नडशी गावचे लोकनियुक्त सरपंच मा. श्री.गोविंदराव कृष्णा थोरात हे होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.श्री. पोपट दैदु थोरात प्रगतशील शेतकरी, नडशी हे होते तसेच प्रगतशील शेतकरी प्रवीण थोरात हेही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थिनी कु. साक्षी सुरेश खंडागळे हिने केले.प्रमुख पाहुणे व अध्यक्षांचा परिचय गौरव विष्णू थोरात यांने केला. आभारप्रदर्शन कु. वैष्णवी सुनील धोत्रे हिने मानले तर सूत्रसंचालन कु.राधिका सुरेश मगर हिने केले. कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.