सातारा:-मराठा क्रांती मोर्चाच्या साताऱ्यातील आंदोलनाने गाठले अर्धशतक….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
मराठा क्रांती मोर्चाच्या साताऱ्यातील आंदोलनाने गाठले अर्धशतक….
सातारा दि: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा बांधव सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षण मागणीची ज्योत तेवित ठेवत आहेत. आज या आंदोलने अर्धशतक पूर्ण केल्या असून भजन कीर्तन व प्रबोधनात्मक कार्यक्रम करून मराठा आरक्षण मिळावे यासाठी जनजागृती करत आहेत.
आज जावली तालुक्याच्या वतीने युवा नेते दिपक साहेबराव पवार, अशोक परामणे ,सुधीर पवार चंद्रकांत गायकवाड ,वसंत शिंदे ,दत्ता पवार, जमीर शेख ,जाकीर सय्यद, हर्षद शेख अजिज बागवान, अनिस पालकर, नजीर सय्यद, मधुकर जाधव, बाबासो पवार, तानाजी पवार, बाळासो पवार ,दत्तात्रय शिर्के, अरुण मोरे, अशोक साळुंखे, बाजीराव बांदल ,धनाजी पवार, तैमूर शेख, बबन चव्हाण व सायगाव , पवारवाडी, दरे खूर्द, मोरघर, रायगाव, खर्शी तर्फ कुडाळ, आने वाडी,सोमर्डी,वरळी बी डी डी चाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळ येथील खंदे कार्यकर्ते व सातारा जिल्ह्यातील सुपुत्र प्रवीण गायकवाड यांनीही या अर्धशतक आंदोलनाला भेट देऊन संविधानात पद्धतीने आरक्षण देणे. हे केंद्र व राज्य सरकारचे कर्तव्य आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी घटनेने केलेल्या तरतुदी प्रमाणे यापूर्वी जर आरक्षण स्वीकारले असते तर ही वेळ आली नसती. परंतु देर आया दुरुस्त आया… या म्हणीप्रमाणे आता तरी छत्रपती शिवरायांच्या मनातील अभिप्रेत असलेले स्वराज्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता- स्वातंत्र्य- बंधुत्व स्वीकारणे आता सर्वांना गरजेचे आहे .अशा शब्दात मराठा आरक्षण आंदोलकांनीही भावना व्यक्त केल्या. आज मराठा आरक्षण मागणीच्या या अर्धशतक आंदोलनासाठी जावलीकरांनी पुढाकार घेतल्याची माहिती समजली आहे.
या आंदोलनासाठी ज्येष्ठ आंदोलक तात्या सावंत, प्रशांत नलावडे , बाबा शिंदे,राजेंद्र बर्गे- पाटील, विकास जाधव, सुनील काटकर, शरद काटकर, हरीश पाटणे, संगीता शिंदे ,अर्चना देशमुख, सुवर्णा पाटील, शहाजी गुजर, अजित निकम,नलिनी जाधव, समिंद्रा जाधव व विशाल कदम, नितीन पाटील,मान्यवर मंडळी परिश्रम घेत आहेत. आज आंदोलनाने अर्धशतक पूर्ण केले आहे लोकशाही मार्गाने शांततेत होणाऱ्या या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा शहरांमध्ये मराठा आरक्षण प्रश्न निकाली निघावा यासाठी आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा अनेक मान्यवरांनी या आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल पुरोगामी कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
————–&&&&——-++——————
फोटो -सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाचे अर्धशतक साजरे करताना मावळे (छाया -अजित जगताप सातारा)