सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेने केली चाचपणी
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेने केली चाचपणी…….
सातारा दि: सातारा लोकसभा मतदारसंघासाठी प्रमुख राजकीय पक्षाने मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. त्यामध्ये कम्युनिस्ट पक्षापासून ते जनता दलापर्यंत अनेक उमेदवारांची नावे पुढे येत आहेत .त्यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार असून सातारा लोकसभा मतदारसंघासाठी त्यांनी दावा केला आहे . आता शिवसेनेचे तीन जाधव पैकी कोणत्या जाधव यांच्या गळ्यात उमेदवाराची माळ पडेल ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
याबाबत माहिती अशी की, एप्रिल- मे महिन्याच्या उन्हाळ्यामध्ये लोकसभा निवडणुकीची मुदत संपून नवीन खासदार नवीन संसद भवन मध्ये जाण्यास उत्सुक झालेले आहेत. यापूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील उमेदवाराबाबत प्रसार माध्यमातून चर्चा होताना दिसून येत होती. आता काँग्रेस- राष्ट्रवादी पिछाडीवर असून भाजप, शिवसेना व अजित पवार गटाची राष्ट्रवादी अशा पद्धतीने महायुती व महाविकास आघाडी या दोन प्रमुख गटबंधन बाबत खासदार निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे.
विशेष बाब म्हणजे सातारा जिल्ह्यातील राजकारणाचे सर्व समीकरण बदलले असून अनेक ठिकाणी आमदार वेगळे ,मतदार वेगळे व कार्यकर्ते वेगळे अशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. तसं पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचे फळी असली तरी या कार्यकर्त्यांमध्ये जाऊन पक्षाची भूमिका मांडणे गरजेचे आहे. पण, सातारा जिल्ह्याचा विचार करता अकरा पंचायत समिती १७ हजार ३९ गावे, १५ मोठी शहरे व २२ ओसाड खेडी असून अनेक ठिकाणी आता नगरपंचायती स्थापन झाल्याने नव नेतृत्व उभे राहिले आहे. आत्तापर्यंत सातारा लोकसभा निवडणुका हे नेत्याभोवती फिरत होत्या. आता जातीय व आर्थिक निकषाच्या समीकरणावरच उमेदवारी निश्चित होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील मतदारांची संख्या पाहता १३ लाख ५० हजार पुरुष व १२ लाख ५० हजार स्री मतदार आहेत. विशेष म्हणजे नव मतदार यांची संख्या सव्वा लाखापर्यंत पोहोचलेले आहे. एकूणच ३,०१९ मतदार केंद्र आहेत. यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरण पाहता कराड दक्षिण आणि उत्तर कराड या दोन मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी, जावळी सातारा -, कोरेगाव- भाजप माण — भाजप, वाई- खंडाळा- महाबळेश्वर- अजित दादा गट व पाटण- शिवसेना गट अशा पद्धतीने आमदार आहेत. फलटण मतदारसंघ राखीव असल्याने या ठिकाणी पक्ष पातळीवर खासदारकीला अटीतटी ची लढत होणे दुरापास्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये फारशी गाव पातळीवर बांधणी करता आलेली नाही. धरण भरलेलं आहे परंतु ,कालवा नसल्यामुळे खेड्यापाड्या गावात वस्तीत एकनाथ शिंदे गटाची शिवसेना पोहोचलेली नाही. पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शक्ती होती .पण ,अनेक कार्यकर्त्यांनी सत्तेशी जुळवून घेतल्यामुळे भाजपला चांगले बाळसं आलेले आहे.
आता भाजपने सातारा लोकसभा मतदारसंघासाठी दावा करणे हे संयुक्तिक आहे. पण महायुती मधील घटक पक्ष म्हणून अजितदादा पवार गट व एकनाथ शिंदे गट हे दोन दावेदार त्यांची भूमिका हे सुद्धा विचारात घ्यावे लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातून शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव व लोकसभा विधानसभा निवडणुकीचा अनुभव असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे .बहुदा शिवसेनेचे जुने जाणते कार्यकर्ते म्हणून सामान्य शिवसैनिक हे दोन्ही जाधवांसाठी चांगल्या पद्धतीने प्रचार करू शकतात. त्यांना भाजप व अजित दादा पवार गटाची साथ मिळाली तर खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मभूमीत त्यांचा खासदार निवडून येऊ शकतो.
भाजपच्या वतीने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, मदन भोसले तसेच नरेंद्र अण्णासाहेब पाटील, विक्रम पावसकर यांची नावं चर्चेमध्ये आहेत. त्याचबरोबर अजित पवार गटाकडून रामराजे नाईक निंबाळकर, नितीन लक्ष्मणराव पाटील व राजकारणातील महिला सुद्धा ऐनवेळी उमेदवार होऊ शकतात. .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडे सध्या उमेदवारी देताना जिल्ह्याचा विचार करता राष्ट्रवादी पेक्षा काँग्रेस वरचढ झालेले असून पृथ्वीराज चव्हाण व शशिकांत शिंदे किंवा सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी एखादी व्यक्ती उमेदवार असू शकतात. याबाबत अद्यापही पक्षीय पातळीवर निश्चित भूमिका घेतली गेलेली नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी ,राष्ट्रीय समाज पक्ष व इतर घटक पक्ष यांची सुद्धा निर्णायक मते आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावर जातीय विभागणी झाली तर त्याचा फायदा होण्यापेक्षा प्रस्थापितांना तोटा होणार आहे याचा विचार करून सर्वसमावेशक उमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे त्या दृष्टीने सध्या तरी एकनाथ शिंदे गटाचे पाढे जड वाटत आहे.
वास्तविक पाहता सातारा जिल्ह्यातील महिला मतदारांची संख्या ही लक्षणे असल्यामुळे एखाद्या पक्षाने महिला सबलीकरणावर चर्चा करण्यापेक्षा महिलांना उमेदवारी देण्याचा निश्चय केले तर सौ .शारदाताई जाधव, सौ चित्रलेखा माने- कदम, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी या सुद्धा खासदार होऊ शकतात. ही ही बाब आता लपून राहिलेली नाही.
शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्याकडे पाहिले जाते . तर दुसऱ्या बाजूला शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी सुद्धा तयारी सुरू केलेली आहे .त्यांच्या मावळ स्वभावामुळे त्यांना अडचणी निर्माण होणार नाहीत.आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवले तर त्यांचा खासदार होणे हे अवघड गोष्ट नाही. त्यांच्यासमोर कुठलेही मोठा आव्हान नाही. हे सुद्धा बेरजेत घेण्यासारखे आहे. सर्वसामान्य जर शिवसैनिक खासदार होत असेल तर त्याचा मनस्वी आनंद मतदारांना सुद्धा होईल. कारण, सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून राजकारण करण्याचे दिवस पुन्हा येतील. याबद्दल कुणाचे मनात शंका नाही. सध्या सातारा लोकसभा मतदार संघाची चर्चा होत असताना माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील प्रतिनिधित्व निश्चित झाले असल्याने फलटण व मान खटाव विधानसभा मतदारसंघात भाजपला झुकते माप देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवर चर्चा होईलच. पण या दोन मतदारसंघात भाजपला व शिवसेनेला सामावून घेण्यासाठी इतर ठिकाणी त्याग करावा लागेल हे मात्र खरे
————————-+————-