वाई:- किसन वीर महाविद्यालयात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS
वाई दि. 25
किसन वीर महाविद्यालयात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसनवीर महाविद्यालयातील स्टाफ वेल्फेअर समितीच्या वतीने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची ४० वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे व प्रमुख पाहुणे कर्नल एम. ए. राजमन्नर यांच्या हस्ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रो. डॉ. सुनील सावंत, प्रो. डॉ. ज्ञानदेव झांबरे, प्रो. डॉ. चंद्रकांत कांबळे, प्रो. डॉ. विनोद वीर, श्री. भिमराव पटकुरे, डॉ. शिवाजी कांबळे, डॉ. अंबादास सकट यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांना शब्दसुमनांनी आदरांजली वाहिली.
स्व. यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत. त्यांचा महाराष्ट्र तसेच देशाच्या उभारणीत व जडणघडणीत मोलाचा वाटा राहिला आहे. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात यशवंतराव चव्हाण यांनी मोठे योगदान दिले आहे. महात्मा गांधींनी पुकारलेल्या असहकार व भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा यशवंतराव चव्हाण यांच्यावर प्रचंड विश्वास होता. राष्ट्रीय पातळीवर काम करत असताना त्यांनी देशाचे उपपंतप्रधान, परराष्ट्रमंत्री, गृहमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री म्हणून सक्षमपणे भूमिका पार पाडल्या.
लोकसभा तसेच विधानसभेचे दूरदृष्टी असणारे ते नेते होते. त्यांनी महाराष्ट्र व देशपातळीवर समतोल विकासाचे धोरण राबवले. त्यांनी समाज व जनमानसात लोकशाही व पुरोगामी विचार वाढवले. स्व. यशवंतराव चव्हाण हे हुशार, अभ्यासू व उदारमतवादी दृष्टीकोन असणारे राजकारणी व समाजकारणी होते. महाराष्ट्राच्या राजकारणात थोर स्वातंत्र्यसेनानी किसन वीर आबा हे माझे नेते आहेत असे ते आवर्जून म्हणत. यशवंतराव चव्हाण एक उत्तम साहित्यिकही होते. कृष्णाकाठ हे त्यांचे गाजलेले आत्मचरित्र आहे. किसन वीर महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख प्रो. डॉ. सुनिल सावंत यांनी यशवंतराव चव्हाण यांचे सह्याद्रीचे वारे हे पुस्तक इंग्रजीत अनुवादित केले आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांचे पुरोगामी विचार अंगीकारणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांनी केले.
स्टाफ सेक्रेटरी डॉ. अंबादास सकट यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. राहुल तायडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.