दहिवडी:-माण -खटावच्या कथित जलनायकांच्या समर्थकांच्याही आता पाण्या अभावी घशाला कोरड,,,,,
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
माण -खटावच्या कथित जलनायकांच्या समर्थकांच्याही आता पाण्या अभावी घशाला कोरड,,,,,
दहिवडी दि: दुष्काळी भाग म्हणून परिचित असलेल्या माण -खटाव भागात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. इतर धरणातून पाणी सोडल्याशिवाय पिण्याच्या पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न सुटणार नाही. हे त्रिवार सत्य असतानाही काही समर्थक आपल्या लोकप्रतिनिधीला यापूर्वी कथित जलनायक संबोधत होते .परंतु ,खरी वस्तुस्थिती निसर्गाने समोर आणली आहे. आता या समर्थकांच्या घशाला पाण्याअभावी कोरड पडल्यामुळे काही समर्थक नदी व कालव्यात पाणी सोडण्याची तर काहीजण कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी करू लागलेली आहेत.
खरं म्हणजे हा नैसर्गिक आघात आहे.पण, पाऊस पडला असता तर जलनायकांच्या बातम्या व फलक लावून स्तुती सुंमनाचा पाऊस पडला असता.आताच्या काळात त्यामुळे कोरडनायक हिच बिरुदावली शोभून दिसत आहे.अशी टीका राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते करू लागलेले आहेत.
श्री .सिद्धीनाथ आराध्य दैवत असलेल्या म्हसवडच्या मानगंगा नदीला पाणी सोडावं. यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय सिन्हा म्हसवड येथील स्मशानभूमी समोर उपोषणाला बसलेले आहेत. माण- खटाव तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती झाली आहे . पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. म्हसवड नगरपालिकेला आठवड्यातून एक वेळ पाणीपुरवठा होत आहे .मात्र, अचानक काही पाणी पुरवठा योजना बंद झाल्यामुळे राऊतवाडी, माने वस्ती, ढोकमोड, हिंगणी ,राजेवाडी, देवापुर विरकरवाडी या गावांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. जलनायक अशी काहींची बॅनरबाजी करणारे या भागात आता पाणी नसल्यामुळे कोरडनायक समर्थक आता तरी पेटून उठतील का? असा प्रश्न स्थानिकांना पडलेला आहे.
एवढेच नव्हे तर राज्यातील ट्रिपल इंजिन असणाऱ्या सरकारच्या विरोधात एकजुटीने रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू झालेली आहे. श्री.गणरायाच्या आगमनापूर्वीच दुष्काळी माण -खटावचा पाणी प्रश्न सुटणार का? पूर्वीसारख्या तोंडाला पाणी पुसणार ?अशी आता खेड्यापाड्यात चर्चा सुरू झालेली आहे. दुष्काळी भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवावा. हे जे सांगत आहेत. अगोदर काहींनी लोकप्रतिनिधी यांचा जलनायक हा केलेला खोटा उलेख्ख पुसून टाकावा. त्यानंतरच कृत्रिम पावसाची प्रयोग करण्याची मागणी करावी अशी ही टीका राजकीय विरोधक करू लागले आहेत.
पावसाळ्यात प्रतिकूल हवामानामुळे महसूल मंडळांमध्ये २१ दिवसाचा पावसाचा खंड जर पडला तसेच सरासरी ५० टक्के पेक्षा कमी पाऊस पडला तर शेतकऱ्यांना शेतीचे नुकसान भरपाई मिळण्याची आदेश जिल्हाधिकारी करू शकतात. तसेच विमा कंपनी व कृषी विभागातील मार्फत मुख्य पिकाच्या सर्वेक्षण केल्यास सात वर्षाच्या सरासरी पक्ष ५० टक्के कमी उत्पन्न असेल तर विमा सुरक्षिततेच्या तुलनेने नुकसान भरपाई मिळते . त्याच बरोबर २५ टक्के आगावू रक्कम मिळते. पण माण -खटावला अद्यापही पंचनामा करण्यासाठी महसूल विभागाचे साधे तलाठी सुद्धा बांधव पोहोचलेले नाहीत. ही शोकांतिका आहे.
दुष्काळी माण -खटाव तालुक्याला खऱ्या अर्थाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे साखळी बंधारे उभे राहिले. याच साखळी बंधाऱ्याला पृथ्वी बंधारा असे ज्यांनी नामकरण केले होते. त्यांनी आता पक्ष सोडलेला आहे पण ज्यांनी ते काम केले. त्यांचे मात्र श्रेय ते लाटू शकलेले नाहीत. हे विरोधकांच्या अनेक सभेमध्ये अधोरेखित होत आहे. सध्या पालकमंत्र्यांनी प्रशासनाला टंचाईचा अहवाल सादर करण्याचे सूचना केलेली आहे .हा दिलासा असला तरी सातारा जिल्ह्यात ७४ गावांमध्ये टंचाई भेडसावत आहे . यामध्ये माण -खटाव अग्रस्थानी आहे. या माण -खटावच्या जनतेला दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार साहेब हे दिनांक २५ ऑगस्ट रोजी फलटण मार्गे दहिवडीला येत आहेत. ते या कोरडनायक असलेल्या लोकप्रतिनिधीचा कसा समाचार घेतील ? तसेच अनेक पदं भोगून उप मुख्यमंत्री अजित पवारांच्या गटाकडे गेलेल्या रामराज्य व कोणता बांध सोडतील हे ऐकण्यासाठी दुष्काळी भागातील सर्वसामान्य जनता आतुर झालेली आहे.
———-&&&——————————
फोटो – माण खटाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे