ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-मुख्यमंत्री शिंदे यांचा सातारा जिल्हा की दरेगाव दौरा ? प्रशासनाने खुलासा करावा.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

मुख्यमंत्री शिंदे यांचा सातारा जिल्हा की दरेगाव दौरा ? प्रशासनाने खुलासा करावा.

सातारा दि: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव दरे ता. महाबळेश्वर जिल्हा सातारा आहे. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून सवड काढून ते आपल्या जन्मभूमीत येतात. हे अभिमानास्पद बाब आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे शासकीय पातळीवर प्रोटोकॉल राबवण्यात येतो. पण त्यांचा हा नियोजित दौरा सातारा जिल्हा की दरेगाव ? एवढा मर्यादित आहे. याचा खुलासा जिल्हा पोलीस यंत्रणा व प्रशासनाने करावा अशी रास्त मागणी सातारा वासियांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांनी केली आहे.
गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यांमध्ये सत्तांतर घडल्यानंतर शिवसेनेचे लढाऊ नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौफेर यशस्वी कामगिरी केली आहे. सामान्य माणसाची नाळ असणाऱ्या नेता म्हणून त्यांचा गौरव आहे. ठाणे जिल्ह्यात त्यांनी केलेल्या कार्याची आजही लोक दखल घेत आहेत. परंतु, दीड वर्षाच्या कालावधीमध्ये सातारा जिल्हा बाबत त्यांचा मुख्यमंत्री म्हणून फारसा उपयोग झालेला नाही. हे त्रिवार सत्य आहे. राज्यात ट्रिपल इंजिन सरकार असल्यामुळे तिन्ही बाजूने शासकीय अधिकाऱ्यावर सत्तेच्या माध्यमातून दबाव तंत्र वापरून विरोधकांचे खच्चीकरण करण्यासाठी त्याचा वापर होत आहे याबाबतही मुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष घालावे अशी लोकांची मागणी आहे पण त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचून दिला जात नाही.
सध्या सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा हे दोन तालुके अधिकृतरित्या शासकीय अभ्यासानुसार दुष्काळी जाहीर केलेले आहे. दुसऱ्या बाजूला माण ,खटाव, कोरेगाव हे तीन तालुके दुष्काळाची झळ सोसत आहेत .त्यांच्या अद्यापही दुष्काळी तालुका म्हणून समावेश झालेला नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती असूनही त्यांना कोणत्याही प्रकारे सोयी सवलती मिळणार नाही. ही बाब आता सातारा जिल्हा वासियांना खटकू लागलेली आहे .देशाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान ,,जय किसान असा नारा दिला होता. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती करून खऱ्या अर्थाने सत्तेचे विकेंद्रीकरण केले. त्यानंतर अनेक पंतप्रधान व मुख्यमंत्री झाले पण असे प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
सध्याचे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेक इन इंडिया, मन की बात, मेरा देश मेरी मिट्टी, नोटाबंदी, थाली बजावो असे अनेक भावनिक योजना राबवत आहे. पण साडेनऊ वर्षांमध्ये त्यांनी जाहीर रित्या एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. मणिपूर पेटत असताना थंड हवेचे ठिकाण गाठून शौर्य सांगत होते.पण, देशातील बहुदा सामान्य लोकांपर्यंत कामगिरी सांगण्याचे धाडस ते प्रसारमाध्यमाद्वारे करू शकत नाही. हे अधोरेखित झालेले आहे.
महाराष्ट्राचा विचार केला तर सातारा जिल्ह्याचे सुपुत्र बॅरिस्टर बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलेले आहे पण बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांचे कार्यक्षेत्र मुंबई व पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यक्षेत्र दिल्ली आणि कराड एवढेच झाले होते. तसाच प्रकार आता एकनाथ शिंदे बाबत घडत असून त्यांचेही कार्यक्षेत्र ठाणे व दरेगाव एवढेच मर्यादित राहिले आहे. अशी आता खुलेआम चर्चा होत आहे.
सातारा जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजक मराठी व धनगर बांधव आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. मागासवर्गीय शिष्यवृत्ती, नोकर भरती तसेच शासकीय पातळीवर योजना राबवल्यास अकार्यक्षम ठरलेले आहेत .जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेचा दबाव तंत्र दिवस वाढू लागलेला आहे.अशा अनेक बाजूने प्रश्नांचा ढिगारा बाजूला काढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा सातारा जिल्हा दौरा उपयुक्त ठरला असता तसेच माण ,खटाव, कोरेगाव या दुष्काळी भागाचा धावता दौरा करून तेथील दुष्काळी परिस्थिती पाहून निर्णय घेणे सोपे झाले असते. असे न करता फक्त बांबू लागवड व तापोळा परिसरात मर्यादित हा दौरा आखून मुख्यमंत्री शिंदे यांनी सातारा जिल्ह्याचे काय भले केले आहे? असा प्रश्न सातारकरांना पडलेला आहे.
याबाबत आता जिल्हा प्रशासनाने पोलीस यंत्रणेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा जिल्हा दौरा की दरेगाव दौरा ? हे स्पष्ट करावे .कारण, सर्वसामान्य माणसांना दरेगावात जाऊन निवेदन देण्यासाठी खूप मोठे कष्ट करावे लागतात. या उलट शासकीय भत्ते व वाहनातून ये जा करणाऱ्या अधिकारी सामान्य माणसाला आपल्या वाहनात घेत नाहीत. सामान्यांची पायपीट दरेगावात आजही सुरू आहे .मुख्यमंत्री शिंदे हे सामान्य कुटुंबातील असल्याचा आम्हाला अभिमान आहे . सध्या त्यांच्या स्वागतासाठी तेच अधिकारी तीच माणसं पण प्रश्न मात्र तिथलेच हे मात्र आता अनेकांना खटकू लागलेले आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने जाणीवपूर्वक विचार करून किमान मुख्यमंत्री शिंदे यांचा सातारा जिल्हा असा उल्लेख न करता फक्त दरेगाव दौरा असा उल्लेख केला तर कोणीही त्यांना सातारा जिल्ह्याचे प्रश्न मांडणार नाहीत. हे सुद्धा रमेश उबाळे यांनी नमूद केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत चंद्रकांत कांबळे , बाळासाहेब जाधव,सुधाकर काकडे, विजय शिंदे, रमेश गायकवाड, शफिक शेख व राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

——————————————
हेलिपॅड वरून मार्गक्रमण करताना मुख्यमंत्री शिंदे व या दौऱ्याबाबत आपली भूमिका सांगताना रमेश उबाळे (छाया- अजित जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button