ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी आरपीआयची साताऱ्यात भव्य रॅली.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी आरपीआयची साताऱ्यात भव्य रॅली.

सातारा दि: प्रत्येक व्यक्तीला पोट असते आणि या पोटाला जात नसते. त्यामुळे अनंत काळापासून संघर्ष करून आरक्षण मिळवून देणारे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात्मकरित्या लेखणीतून मराठा गरीब समाजाला आरक्षण मिळावे. या मागणीसाठी आर पी आय गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे व सचिव चंद्रकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सातारा शहरांमधून भव्य रॅली काढण्यात आली. आर.पी.आयचे राष्ट्रीय नेतृत्व डॉ. राजेंद्र गवई यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली आयोजित केली असून या रॅलीला उदंड प्रतिसाद लाभत आहे.
आज मागास जातींना आरक्षण मिळाले आहे. कारण, मागास जातीमुळे अन्याय सहन करावा लागत होता. आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी झाली असून गरीब मराठा समाजालाही आता हीन वागणूक मिळत आहे. कारण, ते गरीब असल्यामुळे त्यांची चेष्टा होत आहेत. त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. या भावनेतूनच आर पी आय चे राष्ट्रीय नेतृत्व आदरणीय रा सू गवई यांच्या ९४ व्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हा आर पी आय च्या वतीने ही रॅली काढण्यात येत आहे.
या रॅलीमध्ये आर पी आय चे कार्यकर्ते सुहास मोरे, विशाल कांबळे, दीपक जमादार, अशितोष वाघमोडे, मनीषा कदम ,प्रशांत उबाळे, अभिजीत गायकवाड , ॲड.पायल गाडे, रेखा सकटे, लक्ष्मण पोळ, जगदीश कांबळे, शिवाजी धसके ,गणेश काटे, रोहिणी माने, किरण बोभाटे, प्रकाश कांबळे, कोयना वैराट सुजाता गंगावणे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले आहेत.
याबाबत बोलताना सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी सांगितले की, मराठा ही एक जात असून या जातीने आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात गावगाडा चालला होता. आज वाढती महागाई, बेरोजगारी व अंतर्गत हेवेदावे, कोर्टकचेऱ्या या सर्वाचा परिणाम मराठा समाजावर ही झालेला आहे. त्यामुळे ९६ कुळी, ९२ कुळी, कुणबी मराठा, निजामी मराठा असा भेदभाव न करता जो गरीब, कष्टकरी शेतमजूर व कामगार म्हणून कार्यरत असणाऱ्या मराठा समाजाला आरक्षण देणे हा त्यांचा अधिकार आहे. हा त्यांच्या अधिकाराचे रक्षण करणे. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे कर्तव्य समजून आम्ही ही रॅली काढत आहे .सध्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून शांततेने आंदोलन होत आहे .त्यांना आमचा पाठिंबा आहे. परंतु, वेळ आल्यास रस्त्यावर उतरून शहीद होण्याची तयारी आंबेडकर चळवळीचे कार्यकर्त्यांची आहे. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या त्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई,सातारा शहर अध्यक्ष मिलिंद कांबळे, उपाध्यक्ष अमोल गंगावणे, योगेश कांबळे यांनी पाठिंबा दिला आहे.
,—————————————–&————

फोटो-

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button