कोरेगाव:-सातारा जिल्ह्यात सोसायटीच्या रक्कम अपहर प्रकरणी सत्ताधारी आमदारावर आंदोलनाची वेळ…..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा जिल्ह्यात सोसायटीच्या रक्कम अपहर प्रकरणी सत्ताधारी आमदारावर आंदोलनाची वेळ…..
कोरेगाव दि: गतिमान सरकार,, आपले सरकार अशी जाहिरातबाजी करणाऱ्या सध्याच्या महाराष्ट्र सरकारची गाडी ट्रिपल इंजिनवर चालू आहे. परंतु, सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. कोरेगावचे कार्यक्षम आमदार महेश शिंदे यांनी संबंधित शेतकऱ्यांसोबत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर या अपहार प्रकरणी आठ दिवसाची मुदत जिल्हा प्रशासनाने मागून घेतल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी झालेल्या विकास सेवा सोसायटीच्या अपहरण प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पांढरवाडी विकास सेवा सोसायटीच्या तात्कालीन सचिव उदय सूर्यवंशी यांनी सर्वसामान्य शेतकरी सभासदांची फसवणूक करून कर्ज प्रकरण केले व सदर रक्कम हडप केली. एवढी मोठी घटना घडूनही सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या डिस्कळ शाखेने याबाबत खरं म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करून सदर दोषी सचिवावर कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु, नाबार्डचे आठ पुरस्कार मिळवण्याचा अभिमान बाळगणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी अपहार झाल्याचे तपासणी करूनही ठोस कारवाई केली नाही. उलट विशेष लेखापरीक्षकांच्या माध्यमातून सप्टेंबर २२ मध्ये लेखापरीक्षण केले. त्यापूर्वी सचिव म्हणून विजय चव्हाण यांची नियुक्ती केली. याबाबत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने जावक नंबर शेती कर्ज (देखरेख व वसुली )२०२२-२३/६६७१ दि२८/१२/२०२२ रोजी पत्र पाठवून RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर अससोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री.प्रल्हाद चव्हाण यांना कळवले आहे. या गोष्टीला वर्षपूर्ती होऊ नये अद्यापही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. सदरच्या शेतकऱ्यांना ही बाब कोरेगावचे आमदार व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोरेगावच्या संचालक पदावर निवडून आलेले संचालक सुनील खत्री यांना ही बाब सांगूनही अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. सध्या कागदी घोडे नाचून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे .आज काही शेतकऱ्यांनी थेट सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख व जिल्हा बँकेच्या अधिकारी यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेमध्ये आमदार महेश शिंदे यांनी दिनांक १९ ऑक्टोंबर रोजी उपोषण न करता आठ दिवसाची मुदत द्यावी. त्यानंतर धडक कारवाई केली जाईल असे सुचित करण्यात आले आहे.त्यामुळे तुर्त सत्ताधारी पक्षातील आमदार महेश शिंदे यांचे उपोषण आंदोलन काही काळापुरते पुढे ढकलले आहे.
सदर रकमेचा अपहरण करणाऱ्या सचिवावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या श्रमाचे पैसे व त्यांनी केलेले कर्ज प्रकरण आणि त्या कर्ज प्रकरणाची रक्कम अपहर करणे. ही बाब आर्थिक गुन्हा आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात साध्या चार ओळीची तक्रार सुद्धा करण्याचे सौजन्य विकास सोसायटी किंवा सातारा जिल्हा बँकेच्या कडून झालेली नाही. ही बाब शेतकऱ्यांना मनापासून खटकू लागलेली आहे. त्यामुळे आता न्याय कुणाकडे मागावा ? अशी दोलाय मनस्थिती अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची झालेली आहे .
सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित दादा पवार या तीन मातब्बर नेत्याचे ट्रिपल इंजिन राज्याची गाडी गतिमान पळवत आहे. तसेच त्याचा धूर निघत असला तरी वर्षपूर्ती होऊ नये कारवाई झालेली नाही .ही बाब आता सर्वांनाच खटकू लागलेली आहे. खरोखरच राज्य सरकारने आपले सवंगडी सत्ताधारी पक्षात तसेच जिल्हा बँकेचे संचालक आहेत . असे असताना शेतकऱ्यांची बाजू मांडणारे महेश आमदार महेश शिंदे हे सत्ताधारी पक्षाचे असूनही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. दप्तर दीर्घायु योजना राबवली असेल तर मतदार शेतकरी आगामी निवडणुकीत त्याची पोहोच पावती नक्की देतील. अशा शब्दात शेतकरी संघटनेचे कोरेगाव तालुका अध्यक्ष धन्यकुमार जाधव, क्रांतिसिंह नाना पाटील संभाजी ब्रिगेड शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील व अन्य शेतकरी सभासदांनी मत व्यक्त केले आहे.
———————————————–
चौकट -खटाव तालुक्यातील विसापूर पांढरवाडी , वर्धनगड अशा तीन ठिकाणी विकास सेवा सोसायटीच्या रकमेचे अपहरण एक वर्षांपूर्वी झाले असून अध्यापही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्याची चौकशी होणे गरजेचे आहे . अन्यथा कर्ज प्रकरणी शेतकऱ्यांच्या जमिनीवरील बोजा हा त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय ठरणार आहे. असे बोलले जात आहे.
छाया जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिकात्मक फोटो