श्रीरामपूर:-नगरजवळ ‘ द बनिंग ट्रेन दोन डबे भस्मसात . वेळीच उड्या मारल्याने जिवीतहाने टळली.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
नगरजवळ ‘ द बनिंग ट्रेन दोन डबे भस्मसात . वेळीच उड्या मारल्याने जिवीतहाने टळली.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) समृध्दी महामार्गावरील भीषण अपघातामुळे अवघ्या महाराष्ट्राचे मन सुत्र झाले आसमाना अहमदनगर – आष्टी रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे . या घटनेत रेल्वेचे २ कोच जळुन भस्मसात झालेत. सुदैवाने प्रवाशांनी वेळीच डब्या बाहेर उड्या मारल्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही . यासंबंधीच्या वृत्तानुसार सोमवारी दुपारी साडे 3 च्या सुमारास शिराडोह परिसरात अहमदनगर – आष्टी रेल्वेच्या २ डब्यांना आग लागली . त्यानंतर लगेच प्रवाशांनी बाहेर उड्या मारून स्वतः चा जीव वाचवला ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रेल्वेला आग लागल्याची माहिती मिळताच अग्रिशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली . सदर आग रेल्वे इंजिनाला चिकटुन असणाऱ्या पहिल्या २ डब्यांना लागली . हे डबे जनरल बोगीचे होते . पण सुदैवाने या डब्यांत फारशी गर्दी नव्हती . आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले त्यामुळे रेल्वे चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच रेल्वे रोखली . त्यानंतर अग्निशमन दलाला या घटनेची कल्पना देण्यात आली . त्यानंतर काही वेळातच आग्निशमन दलाच्या ५ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले . सोमवरी सकाळी नगरहुन ही गाडी प्रवासी घेऊन आष्टी ला गेली . तेथून परत येत असताना नगर तालुक्यातील वाळू ज या गावाजवळ आग लागली . नगर – सोलापूर महामार्गाच्या क्रॉसिंग जवळ ही घटना घडली.