सातारा:-डॉल्बी मुळे अनेक आळशी लोकांच्या घराची नकळत होते साफसफाई.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
डॉल्बी मुळे अनेक आळशी लोकांच्या घराची नकळत होते साफसफाई.
सातारा दि: सध्या कोणताही उत्सव असेल तर हौशी कार्यकर्त्यांना त्याठिकाणी नेत्यांना घेऊन यावे लागते. नेत्यांच्या बंगल्यात शांतता व शास्त्रीय संगीत असले तरी कार्यकर्त्यांच्या गल्लीमध्ये डॉल्बी लावण्याचे फॅशन निघालेली आहे. परंतु, या डॉल्बीमुळे घराच्या छतावरील जळमट सुद्धा साफ होत असल्याने काही आळशी लोक डॉल्बीची मागणी करू लागलेली आहे . असे विनोदाने बोलले जात आहे.
याबाबत माहिती अशी की, कोणतीही चांगल्या कामाची सुरुवात करताना श्री गणेशा केला जातो. आज गणेशोत्सवानिमित्त असो किंवा युग पुरुषांची जयंती असो त्यांच्या विचाराचे अनुसरण करण्यापेक्षा त्यांचे विचार कुणाच्या कानी पोहोचू नये. यासाठी डॉल्बीचा दणदणाट लावला जातो. सातारा शहरांमध्ये डॉल्बीच्या आवाजाने एक जुनी इमारत कोसळून एका गरीबाचा बळी गेला होता. त्याचे आयुष्य संपले पण त्यातून कुणीही बोध घेतला नाही. आजही डॉल्बीवर जास्त आवाज लावला तर कारवाई करू असे छाती ठोकपणाने अनेक पोलीस अधिकारी सांगतात. परंतु आतापर्यंत किती डॉल्बीवर कारवाई केली ? याचे साधे परिपत्रक काढण्याचे अथवा प्रसिद्धी पत्रक काढण्याचे धाडस सातारा पोलिसांनी केलेले नाही.
याचाच अर्थ प्रसारमाध्यमातून आपलं म्हणणं आले की, आपली जबाबदारी संपली असाच गोंडस अर्थ काही पोलिस अधिकाऱ्यांनी करून घेतलेला आहे. वास्तविक पाहता डॉल्बीमुळे होणारे कानाचे विकार व त्याबाबत जनजागृती करण्यासाठी सामाजिक प्रबोधन व उपक्रम कोणताही गणेशोत्सव मंडळ राबवत नाही. हीच मोठी खंत प्रामाणिक गणेश भक्त व्यक्त करत आहेत .
साताऱ्याचा विचार केला तर जशी प्रजा तसा राजा असं अनंत काळापासून सुरू आहे. त्यामुळे काही मुठभर कार्यकर्त्यांना डॉल्बी लावल्याशिवाय नाचण्याची नशा चढत नाही. हे त्यांना मनापासून पटल्यामुळे अशा काही मूठभर लोकांच्या आग्रहासाठी ७५ ते ८० हजार खर्च करून डॉल्बी लावली जाते. आणि या डॉल्बीच्या आवाजात काही नेतेगण सहभागी होऊन आपण किती विकास केलेला आहे ? हे उघड्या डोळ्यांनी पाहावे असा संदेश देतात पण त्या संदेशाकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. साताऱ्यात डॉल्बी लावा असे राजे व त्यांच्या समर्थक सांगत नाहीत.तरी ही हे उघड्या डोळ्याने काही गणेश भक्तांना पहावे लागत आहे .
डॉल्बी मुळे आजारी व्यक्ती, वयोवृद्ध व लहान बालकांवर मोठा परिणाम होतो. सध्या आवाज ऐकण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त आवाज घुमत असल्यामुळे अनेकांना गणेशाच्या विसर्जनाच्या दिवशी घराबाहेर पडणे मुश्किल झालेले आहे. जे नियमित आरतीला नसतात.ते हमखास मिरवणुकीत सहभागी होतात.दुसऱ्या बाजूला जर पाहिले तर अनेक दिवस आपल्या राहत्या घराची किंवा सार्वजनिक इमारतीची स्वच्छता न केल्यामुळे जळमट व धूळ साचून त्याची झालर तयार झालेली असते. काही आळशी लोकांना ही जळमट व धूळ झाडावी नकोसे वाटते. त्यांच्यासाठी डॉल्बी हा पर्याय झालेला असून डॉल्बीच्या आवाजाने ही जळम टे व धूळ जमिनीवर पडत आहे .हा एकमेव फायदा जर बाजूला केला तर डॉल्बीचे नुकसान म्हणजे आयुष्य कमी करण्याचे यंत्र झालेले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये कमी आवाजात डॉल्बी लावल्यास आमचा विरोध नाही. परंतु काही व्यसनी लोकांसाठी जर डॉल्बीचा आवाज वाढवत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आम्हाला न्यायालयात धाव घ्यावी लागेल. अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे सातारा शहर अध्यक्ष मिलिंद कांबळे, उपाध्यक्ष अमोल गंगावणे ,अनिकेत बडेकर यांनी इशारा दिलेला आहे .सर्व जाती धर्माचा सन्मान राखताना सर्वांनीच डॉल्बी विरोधात आवाज उठवला तर जशा पद्धतीने जातिवाद बंदी, व्यसनमुक्ती, कुऱ्हाड बंदी, हुंडा बंदी, हागंदारीमुक्त असा नारा दिल्यानंतर डॉल्बीमुक्त गाव असा एक नवीन नारा देण्यास काही अडचण नाही. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
—————–&&-&———————-
फोटो -डॉल्बीच्या अशा कर्कश्य आवाजाने अनेकांच्या छातीत धडधड होत असली तरी नाचण्याच्या नशा वाल्यांना त्याचं काहीच वाटत नाही