जयराम स्वामी विद्या मंदिर एक पवित्र ज्ञान मंदिर.
प्रतिनिधी :- दिलीप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख

जयराम स्वामी विद्या मंदिर एक पवित्र ज्ञान मंदिर आहे____माननीय नामदार बाळासाहेब पाटील मायणी प्रतिनिधी___हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेल्या व साधुसंताच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या वडगाव जयराम स्वामी येथील जयराम स्वामी विद्या मंदिर एक पवित्र मंदिर असून आजच्या एकविसाव्या शतकात आधुनिकतेकडे झेप घेत असून जिल्ह्यातील एक उत्कृष्ट शाळा आहे.असे मत सहकार तथा पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी वडगाव येथे बोलताना व्यक्त केले. या विद्यालयातील संगणक कक्ष अद्यावत प्रसाधन गृह
उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉक्टर विकास घार्गे होते.यावेळी गट विकास अधिकारी उदय साळुंखे,नायब तहसीलदार रविराज जाधव, सहाय्यक निबंधक सौ विजया बाबर, गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे, जितेंद्र पवार, संतोष घार्गे सुरेश पाटील, दत्तात्रेय रूद्के, संभाजी थोरात यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात नामदार पाटील पुढे म्हणाले की मी अनेक संस्था पाहिल्या आहेत पण अनेक संस्था प्रसाधन ग्रहाबद्दल बाबत उदासीन असतात आणि मुलीची तक्रार करीत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे तसेच इन्फोसेस फाउंडेशनच्या वतीने शाळेला चाळीस संगणक दिल्याबद्दल मिलिंद इंगुळकर अरुण जगताप या फाऊंडेशनच्या संचालकांचा मंत्र्यांच्या हस्ते वृद्धाचा सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर विकास घार्गे म्हणाले की 27 डिसेंबर 1965 रोजी संस्था स्थापन झाली प्रत्यक्षात हायस्कूल 1966 पासून सुरू झाली त्या वेळी निधी निधी गोळा करण्याचे करण्यासाठी नाटकाचे प्रयोग करत असत शाळेची आधुनिकतेकडे वाटचाल सुरू असून इन्फोसेस फाउंडेशन रोटरी क्लब मुंबई तसेच माजी विद्यार्थ्यांचे आर्थिक सहाय्य लाभत असून आज या शाळेत एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थी असून 50 टक्के पेक्षा जास्त मुली आहेत या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष अंकुश घार्गे सचिव रामभाऊ बरकडे हनुमंत राव भोसले किशोर संभाजी थोरात शिवाजीराव जितेंद्र घार्गे कमलाकर घार्गे सर्व शिक्षक स्टाप तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पवार यांनी केले तर जयवंत घार्गे यांनी व्यवस्थापन केले तसेच प्राचार्य गोविंद काळे यांनी आभार.