सातारा नगरपरिषदेच्या कंत्राटी गरीब कामगारांचा एल्गार.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा नगरपरिषदेच्या कंत्राटी गरीब कामगारांचा एल्गार.
सातारा दि: जगातील कामगारांनी एक व्हा. असा नारा देऊन कामगार चळवळ जिवंत ठेवण्यात आली. पण, आज साताऱ्यात ठेकेदार पद्धतीमुळे कामगार अखेरची घटका मोजत आहे .याचे ज्वलंत उदाहरण सातारा नगरपालिकेत पाहण्यास मिळत असून ठेकेदारी पद्धतीमुळे कामगारांना किमान वेतन व बोनस न दिल्याने अखेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) रोजगार आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष गणेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे कंत्राटी कामगारांनी धाव घेतली आहे.
याबाबत त्यांनी निवेदन दिलेले आहे की, कामगार किमान वेतन कायद्यानुसार वेतन वाढीची मागणी केलेली आहे. परंतु ,अनेकदा आंदोलन करूनही ठेकेदार हा कामगारांच्या विविध मागण्यांबाबत चाल ढकलपणा करत आहेत. त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असताना बोटचे पीचे धोरण राबवत आहे. त्यामुळे सर्वच कामगार दिवाळीच्या सणाला नाराज झालेले आहेत.
सातारा नगरपालिकेच्या सर्व विभागाचे ठेकेदार यांच्यासोबत कंत्राटी कामगार कायदा, किमान वेतन कायदा ,द पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट १९६५ च्या संदर्भ घेऊन लोकशाही मार्गाने रीतसर चर्चा करण्यात आलेली आहे. संबंधित सहाय्यक कामगार आयुक्त व इतरांना त्याची सखोल माहिती देण्यात आलेली आहे. या गोष्टीला दोन महिने होऊनही संबंधित ठेकेदार, अधिकारी व इतर विभागातील अधिकारी फारसा प्रतिसाद देत नसल्याने अशिक्षित व कष्टकरी कामगारांना न्यायासाठी उपाशी राहून शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे.
सध्या या कामगारांच्या न्याय हक्कासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) रोजगार आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष गणेश वाघमारे ,शहराध्यक्ष अजय घाडगे कार्य अध्यक्ष संदीप झोंबडे हे न्यायासाठी लढत आहेत. या वेळेला कंत्राटी कामगार महिला नीता आवळे, सीमा जावळे, कमल बडेकर, रीना बोभाटे, सुनीता कांबळे, कविता साठे, रंजना ढेंबे ,सुमन खवळे, सावित्री वाघमारे, रेखा भोसले, अलका चव्हाण, मंगल पवार, हिराबाई पवार, मीना साठे, शोभा बाबर, अनिता कुचेकर, ममता पवार, नीता अवघडे, संगीता रणदिवे, सुनिता खंडझोडे, प्रथमेश माने, सुरेखा बडेकर ,आशा चव्हाण, रूपा अडागळे असे महिला कंत्राटी कामगार न्यायासाठी हेलपाटे मारत आहेत. सर्वच कामगार गरीब, कष्टकरी, शोषित ,वंचित घटकाचे असल्यामुळे त्यांना न्याय मिळत नाही. वास्तविक पाहता जिसकी जितनी संख्या भारी,,, उतनी उसकी भागीदारी,,, अशा न्यायाप्रमाणे कंत्राटी पद्धतीत वाटप होत आहे . या ठेकेदार पद्धतीने काम करणारे कामगार हे अशिक्षित व संख्येने कमी असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय व त्यांना हक्कापासून वंचित ठेवले जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी मध्ये कामगारांमध्ये होणारा अन्याय व त्या विरोधात आवाज उठवणारे सर्वजण खरोखरच लोकशाहीचे दूत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळो अशी सदिच्छा अनेकांनी दिली आहे.
————————————————
फोटो –सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या न्यायासाठी चर्चा विनिमय करताना कंत्राटी महिला कामगार व गणेश वाघमारे (छाया- अजित जगताप सातारा)