सातारा जिल्हा बंद मध्ये गरिबांचे जातकारण तर काही नेत्यांचे राजकारण……..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा जिल्हा बंद मध्ये गरिबांचे जातकारण तर काही नेत्यांचे राजकारण……..
सातारा दि: सर्वसामान्य माणसांना संविधानाच्या माध्यमातून व लोकशाहीने दिलेल्या अधिकाऱ्याप्रमाणे मराठा समाजाला जगण्याचा अधिकार आहे. यासाठी त्यांना आरक्षण देणे गरजेचे आहे. परंतु लोकशाही मार्गाने अंतरवाली सराटी ता. अंबड जिल्हा जालना येथील आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी जमावर लाठीचार्ज केल्यामुळे मराठा समाजातील माता-भगिनीसह तरुण वर्ग गंभीर जखमी झाले या गोष्टीचा निषेध करण्यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सातारा जिल्हा बंदची घोषणा केली होती.सातारा जिल्हा बंद मध्ये गरीब मराठ्यांचं जातकारण तर काही नेत्यांचे राजकारण सुद्धा यानिमित्त दिसून आले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये या श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील प्रमुख तालुके व गावात व शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा व इतर समाजातील बंधू-भगिनींनी शांततापूर्णरित्या आंदोलनात सहभागी झाले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या एकमेव मागणीसाठी झालेल्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या आंदोलनामध्ये रोजगार बुडवून गोरगरीब, कष्टकरी व दारिद्र्य रेषेखालील मराठा समाज रस्त्यावर उतरले होते.तर काही सधन व राजकारणामध्ये मुत्सद्दी असलेले आणि अनेक योजनांचा लाभ घेणाऱ्या काही नेत्यांनी यामध्ये आपली राजकीय ताकद दाखवून दिली.
खऱ्या अर्थाने नगर जिल्ह्यातील कोपर्डी या ठिकाणी झालेल्या घटनेनंतर महाराष्ट्रातील तमाम मराठा बंधू- भगिनी यांच्यामध्ये जागृती झाली. राज्याचा विचार केला तर ५८ मोर्चे निघाले. या मोर्चाला मार्गदर्शन करणाऱ्या काही नेत्यांनी नंतर आपले राजकीय पक्ष बदलले. आपली भूमिका बदलली .परंतु ,मराठा आरक्षण मिळावे यासाठी ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घ्यावी लागते. वेळे प्रसंगी पदात्याग करावा लागतो. पण दुर्दैवाने लोकप्रतिनिधी यांनी राजीनामा न देता फक्त मोर्चामध्ये मार्गदर्शन करून टाळ्या मिळवल्या. याची आता खंत सुद्धा ग्रामीण भागातील गरीब मराठा व्यक्त करत आहेत.
आज सातारा जिल्हात सातारा, वाई, महाबळेश्वर, पाचगणी ,खंडाळा, खटाव, जावळी, कुडाळ मेढा, सातारा शहर, कराड शहर, वाई शहर अशा शहर व निम शहरांमध्ये आज एक मराठा, लाख मराठा,,,, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,,,, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही,,,,,, छत्रपती शिवाजी महाराज की जय,,,,, बघताय काय सामील व्हा. या फडणवीसचे करायचं काय,, खाली मुंडी वर पाय ,, अशा घोषणाबाजी करण्यात आली. विविध ठिकाणी शांततामय वातावरण मोर्चा काढून स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांना विशेष म्हणजे लहान मुलांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. किमान या पिढीचा तरी विचार करावा अशी रास्त मागणी करण्यात आली होती.
सातारा जिल्ह्यामध्ये पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला असला तरी प्रामुख्याने भाजपवर आंदोलक निशाणा साधत होते .त्याला राजकीय स्वरूप प्राप्त झाले होते. त्याचीही चर्चा आता सर्वत्र सुरू झालेली आहे. सध्या मराठा, धनगर आरक्षण ही न्यायप्रविष्ठ बाब असून न्यायालयामध्ये सक्षमरित्या या समाजातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी यांच्या व्यथा मांडून हे आरक्षण मिळवण्यासाठी तज्ञ वकील मंडळींची नेमणूक करावी. हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
—————————————————
कॅप्शन -सातारा जिल्ह्यातील सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाचे छायाचित्र (छाया- अजित जगताप ,सातारा)