सातारा:-साताऱ्यातील जिल्हा प्रशासन शांतता समितीची बैठकीत वादावादीचे खुलेआम दर्शन.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
साताऱ्यातील जिल्हा प्रशासन शांतता समितीची बैठकीत वादावादीचे खुलेआम दर्शन.
सातारा दि.१ – सातारा जिल्ह्यामध्ये कायदा व संस्थेच्या प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. त्यामुळे सार्वजनिक सण आनंदाने साजरा करण्यापेक्षा भीतीचे वातावरण पसरले आहे. यावर पूर्वी कडक उपाययोजना सातारा जिल्हा पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनामार्फत केले जात होते. पण अलीकडच्या काळात बोटचेपी धोरणामुळे जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासनास सहकार्य करून गणेशोत्सव व ईद सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना करावे लागले आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी विविध पक्षाचे राजकीय नेते व काही व्यक्तींच्या अरेरावीपणामुळे या शांतता बैठकीला गालबोट लागल्याची चर्चा सुरू झालेली आहे.सातारा शहरातील पोलीस दलाच्या अलंकार सभागृहात सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी, मुस्लीम बांधव व प्रशासकीय अधिकारी यांची शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती. यावेळी सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण सूर्यवंशी यांच्या सह पोलीस दलातील तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, मंडळांचे पदाधिकारी, सातारा शहर व तालुक्यातील काही गावातील हिंदू -मुस्लीम बांधव उपस्थित होते.
सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशी प्रशासनाची भूमिका सातारचे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डूडी यांनी मांडली. यंदाच्या वर्षी समाजामध्ये जनजागृती उपक्रम , मतदार नोंदणी, विविध शासकीय योजना याविषयी जनजागृती करावी. यामध्ये चांगले काम करणाऱ्या मंडळाचा प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात येईल. मंडळांनी पर्यावरण व प्रदूषण याविषयीही जनजागृती करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. नागरिकांनी कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जन करावे व मंडळांनीही त्यास प्रोत्साहन द्यावे. मंडळांना परवाना मिळावा यासाठी एक खिडकी योजना तयार करावी. तसेच सातारा नगरपालिकेने लिंक तयार करून त्या माध्यमातून परवानग्या देण्याचे नियोजन करावे. विद्युत विभागाने विद्युत तारांचे सर्वेक्षण करून धोकादायक तारांची दुरुस्ती करणे, उंची वाढवणे ही कामे दहा दिवसांच्या आत ही कामे पूर्ण करून पुन्हा बैठक घेऊन झालेल्या कामांचा आढावा घ्यावा. राज्यात आदर्श असा गणेशोत्सव सातारा जिल्ह्यात साजरा करूया असे ही आवाहनही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले.
पोलीस अधिक्षक श्री. समीर शेख यांनी बैठकीमध्ये मांडलेल्या सूचनांवर नक्कीच निर्णय घेतले जातील. वर्गणी बाबत कोठे जबरदस्तीचे प्रकार घडल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. मंडळांनी समाजकंठकांना मंडळांपासून दूर ठेवण्याची जबाबदारी घ्यावी. तसेच सर्व मंडळांनी सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवावेत असे आवाहनही केले. त्यापूर्वी या बैठकीला वादावादी झाल्याने काही काळ बैठकीचा तणाव निर्माण झाला होता. या वेळेला अमर तागडे ,राजेंद्र शेळके- पाटील व नरेंद्र पाटील आणि इतर कार्यकर्त्यांनी उपयुक्त सूचना मांडल्या. परंतु ,शाब्दिक वादीवाद होऊ नये यासाठी उपस्थित असलेल्या पोलीस बांधवांनी काही कार्यकर्त्यांना सभागृहाच्या बाहेर काढून त्यांची समजूत काढली. हे वादावादीचे ठिकाण नसून या ठिकाणी तरी संयमाने वागा . असे पोलीस अधिकाऱ्यांना सांगावे लागले .
सदरचे वादावादीचे चित्रीकरण काही प्रसारमाध्यमाने केल्यामुळे सातारा जिल्हा प्रशासन, पोलीस दलाच्या शांतता कमिटी मध्ये काय चालले आहे ? याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली आहे .परंतु, सातारकरांनी कायदा व सुव्यवस्था राखून शांततेमध्येच सार्वजनिक उत्सव साजरे करावेत. याबाबत आता स्वयंशिस्तीने शांतता प्रिय नागरिकांनी नियम पाळावेत. असे आता सूचित करावे वाटत आहे. अशी प्रतिक्रिया जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे.
——————-
फोटो -सातारा जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस दलातर्फे शांतता कमिटीच्या बैठकीतील अशांतता