सातारा जिल्हाधिकारी श्री डूडीसाहेबांनी दरडी कोसळण्याचे संकेत व खबरदारीची सांगितली उपाय योजना.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा जिल्हाधिकारी श्री डूडीसाहेबांनी दरडी कोसळण्याचे संकेत व खबरदारीची सांगितली उपाय योजना.
सातारा दि: महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यात अतिवृष्टी व दरड कोसळण्याचे प्रकार घडत असल्यामुळे वित्तहानी व जीवित हानी झालेली आहे. याबाबत आपत्ती व्यवस्थापनाने काटेकोरपणाने संकट टाळावे. यासाठी काही संकेत व उपायोजना तज्ञ मंडळींच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम राबवलेला आहे. सातारचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डूडीसाहेब यांनी आज सातारा येथे पत्रकार परिषदेमध्ये दरडी कोसळणाऱ्याच्या अनुषंगाने पूर्वसंख्येत ओळखणे व खबरदारीचे उपायोजना सांगितली आहे.
या पार्श्वभूमीवर भूजलाचे निरीक्षण करणे .अत्यंत आवश्यक आहे .विहिरी, विंधन विहिरी जर तीन तासांहुन अधिक काळ वाहत असेल. जर अचानक नवीन झऱ्याचे उगम आढळला व झऱ्याच्या प्रवाहामध्ये पाचपट अथवा अधिक वाढ झालेली असेल. झऱ्याच्या पाण्याचे तापमान नैसर्गिक तापमानापेक्षा साधारण पाच अंश सेल्सियस पेक्षा अधिक भासत असेल.
अतिवृष्टीमुळे झाड, विद्युत पोल, कुंपण तिरके होणे. ही लक्षणे दिसू लागणे .पक्षी व जनावरांच्या वागण्यात अचानक बदल होणे. त्यामध्ये वेगळा आवाज काढणे किंकळणे . पायाने जमीन उकरणे. पक्षी एकत्र देणे. घरातून जमिनीतून पाण्याचे पाझर फुटणे अथवा झरे निर्माण होणे व घरातील जमिनीची फरशी उचकटणे. जमिनीला नवीन ठिकाणी पाजर फुटणे. नियमित येणाऱ्या झऱ्यातून अचानक गढूळ पाणी येवू लागणे. भात खचरांना भेगा पडणे. अशी लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी अशा ठिकाणापासून किमान पाचशे मीटर दूर सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होणे. अपेक्षित आहे.
तसेच ही बाब शासकीय सेवेत असणाऱ्या सर्व यंत्रणेला कळवणे हे काम केले पाहिजे .सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यातील दळण भागातील एकूण ४८९ कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलेले आहे. अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यातील घाट भागातील पडलेल्या सर्व दरडी हटवण्यात आलेले आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व वाहतुकीचे मार्ग सुरळीत सुरू केलेले आहेत अशी माहिती दिलेली आहे.
सातारा जिल्ह्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमान या वेळी जून ते सप्टेंबर ८८६.२ मिलिमीटर झालेले आहे आजचे ३७१.१ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. कोयना धरणाची क्षमता– १०५.२५ टी.एम.सी. आहे. सध्या६१.६४ टी.एम.सी. धोम धरण— १३.५० उपयुक्त पाणीसाठा ७.६५, धोम बलकवडी— ४.८ आजचा उपयुक्त पाणीसाठा ३.४१, कन्हेर—- १०.१० उपयुक्त पाणीसाठा५.५४ उरमोडी ९.९६ उपयुक्त पाणीसाठा ५.१६ तारळी— ५.८५ उपयुक्त पाणीसाठा ५पी.एम.सी. मोरणा— १.३९ उपयुक्त पाणीसाठा ००.८८ टक्के व वांग मराठवाडी— २.७३ उपयुक्त पाणीसाठा आजचा१.४३ एवढा झालेला आहे. धरण क्षेत्रात कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर परिसरात दमदार पाऊस असून आतापर्यंत सरासरी सर्व धरण निम्म्यापेक्षा जास्त प्रमाणात भरलेले आहेत असे स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला उप जिल्हाधिकारी प्रशांत आवटे,आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अधिकारी देविदास ताम्हाणे, सामान्य विभाग जिल्हाधिकारी कार्यालय तहसिलदार शितोळे व माहिती अधिकारी वर्षा पाटोळे
——————————————————-
फोटो – दरड कोसळणे पूर्व संकेत फोटो