सातारा:-जावळी तालुक्यात अधिकृत दारू परवाना पुन्हा सुरू करण्याची पर्यटक व ग्रामस्थांची मागणी.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
जावळी तालुक्यात अधिकृत दारू परवाना पुन्हा सुरू करण्याची पर्यटक व ग्रामस्थांची मागणी.
कुडाळ दि: युवा पिढीला योग्य पद्धतीने मार्गक्रमण करण्यासाठी मोठ्या जिद्दीने जावली तालुक्यात दारूबंदीचा नारा सर्व जावळी करांनी यशस्वी करून दाखवला. याला आता बरेच महिने झाले असली तरी प्रत्यक्षात मात्र अनाधिकृत दारू धंदे वाढले आहेत . लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे .तसेच काही व्यसनी पर्यटक इतर ठिकाणाहून दारू आणून जावळी तालुक्यात पीत आहेत .त्यामुळे संपूर्ण जावळी तालुक्यात अधिकृत दारू परवाना पुन्हा सुरू करावा. अशी मागणी पर्यटक व ग्रामस्थांनी केलेली आहे.
याबाबत माहिती अशी की, जावली तालुक्यामध्ये दरवर्षी दारू पिऊन अपघात व नुकसान झाल्याची संख्या वाढू लागली होती. सामाजिक जाणीव ठेवून व्यसन मुक्ती चळवळ कार्यकर्ते,जावळीचे तात्कालीन आमदार शशिकांत शिंदे व इतर शासकीय अधिकारी,लोकप्रतिनिधींनी, महिला मंडळ यांनी जावळी तालुका दारूबंदी व्हावी. या दृष्टीने यशस्वी प्रयत्न केले. विशेष बाब म्हणजे तालुक्यातील कुडाळ, आनेवाडी, मेढा , केळघर हुमगाव या ठिकाणी असलेल्या अधिकृत देशी -विदेशी दारू परवानाधारकांनी दारू विक्री बंद केली. या त्यांच्या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात त्याचा फायदा झाला.प्रसारमाध्यमानेही या विधेयक उपक्रमाला चांगली प्रसिद्धी दिली. नव्याचे नऊ दिवस सरल्यानंतर पुन्हा एकदा जावळीत मटणाचा ढीग आणि दारूचा महापूर सुरू झाला. याला कारणीभूत राज्य उत्पादन शुल्क विभाग,अनाधिकृत दारू धंदेवाले तसेच स्थानिक काही लोकप्रतिनिधी,पोलिस , ग्रामस्थ जबाबदार असल्याचे बोलले जावू लागले आहे .
राजकीय दृष्ट्या ”””””” गाव तेथे शाखा घर, तेथे कार्यकर्ता”””””” अशा पद्धतीने””””””’ गाव तेथे अनाधिकृत दारू धंदा, घर तिथे दारुडा””””””’ अशी अवस्था झालेली आहे. त्यातच आता वाढत्या पर्यटनामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक हे स्थानिक पातळीवर दारू विक्री खरेदी करत असताना शंभर ते दीडशे रुपये ज्यादा देत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी अनाधिकृत दारू व्यवसाय सुरू झालेले आहेत. एकूण महिन्याचा जर हिशोब केला तर लाख ते दीड लाख रुपये एका महसूल विभागातून म्हणजे जावळी तालुक्यातील किमान दहा लाख रुपयांची आर्थिक उलाढाल ही दारूच्या किमतीपेक्षा जास्त प्रमाणात होऊ लागलेली आहे .त्यामुळे शासनाचाही महसूल बुडत आहे. असे बोलले जात आहे. एकीव येथील दोन तरुणांचा खून झाला आहे. याला दारू पिऊन धिंगाणा घातला गेल्याचे सांगितले जाते. याची ही यानिमित्त आठवण करून दिली आहे.
याबाबत अर्थतज्ञ मंडळींनी असे नमूद केले आहे की, अधिकृत जर दारू विक्री सुरू केली तर हा जो पैसा जो इतरांच्या दारू धंदेवाल्यांच्या व इतरांच्या खिश्यात जातोय याची जाणीव आता ग्रामीण भागातही होऊ लागलेली आहे. सध्या शेतमजूर हा ४०० ते ५०० रुपये मजुरी घेऊन येतो . त्यातील काही जण दारूसाठी दोनशे रुपये खर्च करतात म्हणजे एकार्थी शंभर रुपये दारू धंदेवाल्याच्या खिशात ज्यादा जात आहेत. तर शासनाचा महसूल बुडत आहे. याचा गांभीर्याने विचार करून पुन्हा एकदा जावळी तालुक्यात अधिकृत दारू धंदे सुरू करावे. अशी मागणी पर्यटकांनी व ग्रामस्थांनी केलेले आहे. ज्यांचा यापूर्वी दारू परवाना होता त्यांना राज्य उत्पादन शुल्क व इतर यंत्रणेने परवानगी द्यावी म्हणजे गोरगरिबांचे श्रमाचे पैसे वाचतील असे तर्क लढवण्यात येत आहे. दरम्यान, जावळी तालुक्यात व्यसन मुक्ती चे काम जोमाने होत असले तरी आभाळ फाटले असताना कुठे कुठे ठिगळ लावणार? असा ही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दारू विक्री अधिकृत सुरू करावी अशी मागणी होऊ लागली आहे. ही दारू दुकाने सुरू करताना व्यसन मुक्ती चळवळ कार्यकर्ते यांचे ही मत विचारात घेतले पाहिजे असे ही नमूद केले आहे.
——————————————- जावळी तालुक्यातील प्रतिनिधिक स्वरूपातील छाया चित्र