सातारा:-बुलेट सायलेन्सर बदलणाऱ्यांवर साताऱ्यात कारवाई करण्याची मागणी.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
बुलेट सायलेन्सर बदलणाऱ्यांवर साताऱ्यात कारवाई करण्याची मागणी.
सातारा दि: सध्या तरुणाईला बुलेट मोटरसायकल घेऊन कर्कश आवाज होण्यासाठी सायलेन्सर मध्ये बदल करून शांतता भंग करणाऱ्या
वाहन चालकावर कारवाई करण्याची भूमिका सातारा वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतल्यामुळे सर्वत्र समाधान पसरले आहे. वास्तविक बुलेट सायलेन्सर मध्ये बदल करणाऱ्यानावर कडक कारवाईची अंमलबजावणी झाली तर त्याला आळा बसणार आहे .कारण, जिथून सुरुवात होती तिथेच लिपले तर डोक्यावरून पाणी जात नाही. अशी ग्रामीण भागात म्हणी आहे. त्याची आठवण अनेकांनी करून दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, पूर्वी बुलेट मोटरसायकल घेण्यासाठी सातारा जिल्ह्यात सुविधा नव्हती. त्याच बरोबर बागायतदार, वरिष्ठ पोलीस अधिकारी व इतर अधिकारी या बुलेट मोटरसायकलचा वापर करत होते. अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार, वाळू , दारू, मटका, गुटखा तसेच इतर मार्गाने काही लोकांच्याकडे पैसा आला आणि या पैशातून श्रीमंती दाखवण्यासाठी गरज नसतानाही काही जण बुलेट मोटरसायकल खरेदी करून सायलेन्सर मध्ये बदल करतात. या सायलेन्सरच्या बदलाने आवाजाचे प्रदूषण होत असते. अनेकांच्या धडकी भरते .मुळातच काही मंत्री महोदयांना सायरन चा आवाज वाढवण्यामध्ये समाधान वाटत असल्याने अनेकांनी आपल्या मोटरसायकलची फायरिंग लोकांना आवडते. असा गोड गैरसमज करून घेतला. त्यातून मग डोकेदुखी वाढल्यामुळे अखेर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारलाआहे .आतापर्यंत सव्वाशे ते दीडशे बुलेट मोटरसायकलच्या सायलेन्सर मध्ये बदल करण्याचे आढळून आलेले आहे. ही बाब फार गंभीर असून हजार ते दीड हजार रुपये खर्च करून सायलेन्सर मध्ये बदल केल्यानंतर याकडे आता बारकाईने सर्वांचे लक्ष लागलेली आहे. मुळातच बुलेट मोटरसायकल ही वजनदार व प्रतिष्ठा वाढवणारी असली तरी या मोटरसायकलच्या सायलेन्सरने व गतीने अनेक अपघात झालेले आहेत. त्यातून काहींना प्राण गमवावे लागलेले आहेत. ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही. कायद्यावर सुव्यवस्था राखण्यासाठी नियमावली तयार केली जाते .पण त्याचबरोबर त्याबाबत पळवाटही तयार केली जाते. सातारा पोलीस यंत्रणेने जशा पद्धतीने कारवाई केलेली आहे. तशाच पद्धतीने वाहनावरील फॅन्सी नंबर प्लेट बाबतही कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. विशेष म्हणजे काही मोटरसायकलवर फॅन्सी नंबर आहेत. तसेच अनेक नंबर प्लेटमध्ये नावात बदल केलेले आहेत. प्रसारमाध्यमाच्या काही मोटरसायकल वर नंबर नसल्याचे अनेकांनी सांगितले. पण, कारवाई होत नाही. ही बाब पोलीस यंत्रणेने लक्षात आणून कारवाई केली तर खऱ्या अर्थाने कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम सातारा पोलीस यंत्रणा करत आहे असे सामान्य माणसांना वाटू लागेल.काही बुलेट मोटरसायकलच्या आवाजाने लोकांना त्रास होतो. तशा पद्धतीने सायरनचा ही त्रास सहन करावा लागत आहे.याकडेही संबंधित लक्ष घालून सुधारणा करावी अशी मागणी होत आहे .कारण मोटरसायकलचा सायलेन्सर चा आवाज हा भयानक असला तरी काही सायरनचा आवाज भीतीदायक वाटत आहे. यामुळेही वडाप वाहतूक करणाऱ्यांचे चलबिचल होत असून अपघात होण्याची शक्यता आहे. असे ही काहींनी सांगितले आहे.
—————————————————————
फोटो – कारवाई करण्यात आलेल्या काही मोटर सायकल व अधिकारी वर्ग (छाया- अजित जगताप सातारा)