आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहता:-मनुष्य हा असमाधानी माणूस आहे. ह भ प चैतन्य महाराज वाडेकर.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
लोहगाव( वार्ताहर)
मनुष्य हा असमाधानी माणूस आहे .कितीही कमवले तरी मनुष्य हा समाधानी होऊ शकत नाही .त्याला त्याचे सुख उद्याच्या आशेत दडल्यामुळे तो कधीही सुखी होऊ शकत नाही असे विचार ह भ प चैतन्य महाराज वाडेकर यांनी व्यक्त केले .राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे खासदार सुजय दादा विखे पाटील मित्र मंडळ. मराठा सेवा संघ शिवजयंती उत्सव समिती व समस्त ग्रामस्थ पाथरे बुद्रुक आयोजित शिवजयंती उत्सव समिती निमित्त भांबोली चाकण येथील ह भ प चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन संपन्न झाले या प्रसंगी बोलताना चैतन्य महाराज वाडेकर म्हणाले की मनुष्य हा असमाधानी माणूस आहे तो मेल्याशिवाय समाधानी होऊ शकत नाही .परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नजरांना पाठवला होता परंतु तुकाराम महाराजांनी तो परत पाठवला तो नजराणा परत पाठवण्याचे दायित्व हे फक्त तुकाराम महाराजांमध्ये होते परंतु मनुष्य ते नाही किंवा दायित्व नाही तो कधीही समाधानी होऊ शकत नाही शिवाजी महाराजांची चरित्र हे युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महारजांपेक्षा आताच्या युवकांना केस वाढलेला भाई आदर्श वाटतो परंतु छत्रपती हे आपले दैवत आहे लाखोचे सैन्य घेऊन येणाऱ्या अफजल खानला बाराशे सैन्य असणाऱ्या छत्रपतीची दहशत होती .त्यामुळे आत्ताच्या युवा पिढिने मी भाईची दहशत पेक्षा शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे असे विचार त्यांनी यावेळी मांडले यावेळी पाथरे बुद्रुक सह पंचक्रोशीतील मोठे जनसमुदाय सह युवा पिढी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता.