खटाव:-राज्यात संततधार पाऊस, पण मायणी परिसर कोरडा ठणठणीत.
पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा:-9890318605
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा
राज्यात संततधार पाऊस, पण मायणी परिसर कोरडा ठणठणीत.
मायणी प्रतिनिधी—-संपूर्ण महाराष्ट्रात संतत धार पाऊस सुरू असून हवामान खात्याने अनेक भागात मुसळधार अति मुसळधार पावसाचे संकेत दिले आहेत मात्र मायणी परिसरात केवळ पावसाची भूर भूर येत असून मायणी परिसर ठणठणीत कोरडा पडला आहे याबाबत अधिक माहिती अशी की शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागती पूर्ण केल्या आहेत कर्ज काढून खते बियाणे खरेदी केले आहेत परंतु आवश्यक पाऊस नसल्याने शेतकऱ्याचे डोळे मेघराजाकडे , लागले आहेत या खरीप हंगामात कडधान्य ,मका ,बाजरी ही आर्थिक उत्पन्न देणारी पिके घेतली जातात परंतु सध्या केवळ पाच मिलिमीटर पाऊस पडल्याने पेरणी कशी करायची याची आस शेतकऱ्यांना लागली आहे खरिपाच्या पेरणीसाठी पन्नास मिलिमीटर कमीत कमी पाऊस पडावा नंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी अशी माहिती कृषी आयुक्त यांनी दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे सध्याच्या परिस्थितीत पेरणी केल्यास ते पिक उगवणार नाही दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी मेघराजाने पर्जन्य भरपूर पर्जन्यवृष्टी करावी अशी प्रार्थना महाराष्ट्राचे दैवत विठोबा माऊली कडे बळीराजांने केली आहे