सातारा:-श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन, सामान्य वारकऱ्यांना दर्शनाची आस.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या
पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन, सामान्य वारकऱ्यांना दर्शनाची आस.
सातारा दि. 18 : शेकडो वर्षांपासून सुरू झालेल्या श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई व वरिष्ठ अधिकारी यांनी मोठया आनंदाने पालखीचे स्वागत केले. आता सर्व सामान्य वारकरी संप्रदायातील व्यक्ती व माऊलीवर प्रेम असणाऱ्या भक्तांना दर्शनाची आस लागली आहे.
सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे रविवारी दुपारी पालखीचे आगमन झाले.वारकऱ्यांच्या दिंडीतून फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन श्री ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा पंढरपूर मार्गावर आगेकूच करीत आहे..
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार बाळासाहेब पाटील,आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांनी चोख बंदोबस्त व स्थानिक अधिकारी वर्गाच्या सहकार्याने पालखी सोहळ्यात पुष्पहार अर्पण करुन स्वागत केले. तसेच एवढ्या मोठ्या गर्दीत ही मनसोक्त दर्शन घेतले.
नीरा नदीतील स्नानानंतर श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवर प्रतिष्ठित नागरिक व भाविकांनी दर्शन घेतले. माऊलीच्या दर्शनासाठी राजकीय पक्षाचे नेते,
स्थानिक कार्यकर्ते व भाविकांनी एकच गर्दी केली होती. हरिनामाच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात पालखी सोहळ्यात सामाजिक संदेश देणारे फलक तसेच स्वागताच्या फलकाने संपूर्ण खंडाळा तालुका फलकमय झाला होता. राजकीय पक्षांच्या फलकाने भावी लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा लक्ष वेधून घेतले होते. वारकऱ्यांसाठी सातारा जिल्हा प्रशासनाकडून स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय, आरोग्य सुविधा यासह विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत.त्याचा वापर अतिमहत्वाच्या व्यक्ती कधी ही करीत नाहीत . सर्व काही वारकऱ्यांसाठी असते. पण, सातारा जिल्ह्यात पालखीचे आगमन होताच राजकीय पक्षाचे नेते दर्शनासाठी घुसखोरी करतात. ही आता अघोषित परंपरा झाली आहे. अशी टीका सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.
नीरा नदीच्या तीरावर पाडेगाव येथे पालखी स्वागताच्या ठिकाणी सातारा पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.