ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खटाव:-कलेढोण ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत मुमताज सलीम तांबोळी यांची बिनविरोध निवड.

ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख:9890318605

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख

कलेढोण ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत मुमताज सलीम तांबोळी यांची बिनविरोध निवड- मुमताज तांबोळी यांचा सत्कार करताना संजीव साळुंखे व इतर) मायणी प्रतिनिधी_
कलेढोण ग्रामपंचायत मधे झालेल्या पोटनिवडणुकीत मुमताज सलीम तांबोळी यांची हनुमान पॅनल व ग्रामविकास पॅनल यांच्या संगनमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी या बैठकीस संजीव साळुंखे, चंद्रकांत पवार, राजूशेठ जुगदर , संजय टकले, राजेंद्र नायकुडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पाच नंबर वार्ड मध्ये सौ माधुरी राजेंद्र लोखंडे या ओबीसी महिला वर्गातून निवडून आल्या होत्या. माधुरी लोखंडे या साळुंखे गटाच्या उमेदवार होत्या परंतु विरोधकांनी तीन अपत्य असल्याची हरकत घेतल्यामुळे वॉर्ड पाच मधील उमेदवारी बाद झाली होती. रिक्त झालेल्या जागेवर सर्वसाधारण महिला या जागेसाठी आरक्षण जाहीर झाले होते यासाठी साळुंखे गटातून पुन्हा राजेंद्र लोखंडे यांच्याच घरात उमेदवारी द्यावी असा कार्यकर्त्यांचा सूर होता परंतु स्वतः राजेंद्र लोखंडे यांनी उमेदवारी आपल्या घरात न घेता इतरत्र द्यावी असा आग्रह धरल्यामुळे मुमताज सलीम तांबोळी या महिलेची उमेदवार म्हणून एकमताने निवड करण्यात आली तर राष्ट्रवादीतून अगदी शेवटच्या क्षणी तीन महिलांची नावे उमेदवार म्हणून समोर आली होती त्यामध्ये शाहराबी शिकंदर तांबोळी, सुवर्ण दशरथ दबडे, व सलीमा उस्मान तांबोळी ही नावे समोर आली होती . वार्ड नंबर पाच हा साळुंखे गटाचा नेहमीच बालेकिल्ला राहिला असून विरोधी गटाचे उमेदवार येथे कायमच पराभूत होत आले आहेत परंतु गेल्या वेळेस झालेल्या निवडणुकीत मात्र सुरेश शेठ शिंदे व बापू गटाने साळुंखे गटातील अनेक बालेकिल्ले उध्वस्त करत आपला विजय संपादन केला होता परंतु वार्ड नंबर पाच हा मुस्लिम समाजाची वोट बँक जास्त प्रमाणात असल्यामुळे विरोधी गटाला हा बालेकिल्ला भेदता आला नाही त्यातच राजेंद्र लोखंडे सारख्या मुरब्बी कार्यकर्त्याच्या घरात उमेदवारी असल्यामुळे आपले कौशल्य पणाला लावत विजय संपादन केला होता .
कायद्याच्या नियमाप्रमाणे तीन अपत्य असलेल्या व्यक्तीला निवडणुकीत भाग घेता येत नाही या निकषावर राजेंद्र लोखंडे यांच्या पत्नीचा अर्ज अखेर बाद ठरवत विरोधकांनी बाजी मारली होती. रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घोषित झाल्यावर ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचा सूर होता तर काही कार्यकर्त्यांना निवडणूकच हवीच होती परंतु दोन्ही गटातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी एकत्र येत अर्ज माघारी घ्यायच्या अखेरच्या दिवशी दिनांक 8-4-2023 रोजी दुपारनंतर विरोधी गटातील राष्ट्रवादीच्या तिन्ही उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेऊन मुमताज सलीम तांबोळी यांना बिनविरोध निवडून दिल्याची ही घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. यासाठी सुरेश शेठ शिंदे व बापू गटातील प्रमुख कार्यकर्त्यांनी समय सूचकता दाखवीत तीन ही अर्ज काढून ही जागा बिनविरोध करून गावापुढे एक नवीन आदर्श ठेवला आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button