खटाव:-दहा वर्षांनी माण- खटावला दुष्काळ म्हणण्याची हिंमत कुणाची होणार नाही- आ.जयकुमार गोरे
प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी अजित जगताप सातारा
दहा वर्षांनी माण- खटावला दुष्काळ म्हणण्याची हिंमत कुणाची होणार नाही- आ. जयकुमार गोरे
वडुज दि: खटावच्या मातीतून हायवे जात आहे. दुष्काळ वेगाने हटत आहे. ८० टक्के शेतीला पाणी मिळणार असून दहा वर्षात माण- खटावला दुष्काळ म्हणण्याची हिंमत कोणाची होणार नाही असे प्रतिपादन भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष तथा माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी वडूज ता. खटाव येथे झालेल्या उद्घाटनाप्रसंगी केले.
या वेळेला माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, अनिल माळी, नगराध्यक्ष सौ. मनीषा काळे, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ दादासाहेब गोडसे, विश्वासराव काळे, परेश जाधव, धनंजय चव्हाण, प्रदीप शेटे, नगरसेवक- नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व यंत्रणा मदत करीत असून संघर्षातून म्हसवड एम.आय.डी.सी. उभी राहिलेली आहे. पंचवीस हजार युवकांना काम मिळणार आहे. खटाव च्या मातीतून ५४ हजार कोटी रुपये खर्चाचा महामार्ग जाणारा असून जमिनीच्या किमती वाढणार आहेत. जिहे- कठापुर योजनेतून पाणी मिळाले असून आता तर टेंभूचा सहावा टप्पा मंजूर झाल्याने पुढील महिन्यात सुधारित प्रशासकीय मान्यता व दोन महिन्याने निविदा काढण्यात येणार आहे. त्यामुळे दुष्काळी भागात ८० टक्के शेतीला पाणी मिळणार आहे. विकासाचे दालने उभी राहत असून व्यापारी व शेतकरी खुश आहेत. शाश्वत पाणी आल्यामुळे नवीन व्यवसाय उभा राहत आहे. मराठी मुलं व्यवस्थित धाडस करीत आहेत. शेतकऱ्यांच्या खिशात पैसा येणार आहे. असे स्पष्ट करून आमदार गोरे म्हणाले, सध्या विकास कामांमध्ये सर्वांचे सहकार्य लाभत आहे. पूर्वी दुष्काळी भाग असल्याने लोकांना स्थलांतराशिवाय पर्याय नव्हता. परंतु ,अलीकडच्या काळात केंद्र व राज्य सरकार मधून रखडलेल्या योजनांना गती मिळत आहे . असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला वडुज नगरीचे नगरसेवक- नगरसेविका तथा सामाजिक कार्यकर्ते तसेच आकाश जाधव, चंद्रकांत कोकाटे, विक्रम रोमण, ऋषिकेश पडळकर व ग्रामस्थ, व्यापारी व नागरिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भर उन्हातही आ. गोरे यांचे विचार ऐकण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते विकास गोसावी, जयकुमार शिंदे, विठ्ठल बलशेठवार, पृथ्वीराज गोडसे, रामभाऊ जाधव , आबासाहेब गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते.
—————————————————————–
फोटो – वडुज ता. खटाव येथे बोलताना आ. जयकुमार गोरे व मान्यवर (छाया – सूरज पोतदार, वडुज)