खटाव:-जनतेची दिशाभूल करून सत्ता हस्तगत केली परंतु आश्वासनांचे काय —–आनंदराव शेवाळे
प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा:9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार प्रा.पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख
जनतेची दिशाभूल करून सत्ता हस्तगत केली परंतु आश्वासनांचे काय —–आनंदराव शेवाळे
विरोधकांचा सत्ताधाऱ्यांच्या वर हल्लाबोल
मायणी प्रतिनिधी
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मायणी ग्रामपंचायत निवडणुकीत सुरेंद्र गुदगे गटाने एक हाती सत्ता मिळवत डॉ येळगावकर गटाचे पाणीपत केले होते परंतु ज्या मुद्द्यांवर गुदगे गटाने ही सत्ता मिळवली त्याच मुद्द्यांचा विसर गुदगे गटाला पडल्याची खंत मायणीचे माजी उपसरपंच आनंदराव शेवाळे यांनी केली .
काल मायणी येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले या पत्रकार परिषदेला मायणीचे माजी उपसरपंच आनंदराव शेवाळे माजी उपसरपंच अँड सुरज पाटील, अंकुश राजपूत, राजेंद्र कचरे ग्रामपंचायत सदस्य गंगाराम सुगदरे,प्रा पुस्तके सर, आदी उपस्थित होते यावेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवताना म्हणाले की आमच्या काळात कोरोना असूनही तीन वर्ष अतिशय उत्कृष्ट काम केले परंतु राहिलेल्या दोन वर्षात आम्ही विकास काम केली परंतु तीकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यात आम्ही अपयशी ठरलो . लोकांची दिशाभूल करून सत्ता हस्तगत केली परंतु निवडणुकीच्या वेळी लोकांना दिलेली आश्वासने त्यांनी पूर्ण केली का याचे आत्मपरीक्षण त्यांनी करणे गरजेचे आहे सत्ता ताब्यात येऊन पाच महिने झाले तरीही आश्वासन दिलेल्या कामापैकी कोणत्याच कामाला अजूनही सुरुवात केली नसल्याचे जनतेच्याही लक्षात येऊ लागले आहे.
सध्या सगळ्यात भेडसावत असलेला प्रश्न पार्किंग, सम विषम पार्किंग करण्याबद्दल आमच्या काळात डॉ येळगावकर व माजी सरपंच सचिन गुदगे यांच्या प्रयत्नामुळे अधिकाऱ्यांनी ही योजना राबिण्यास परवानगी दिली होती, परंतु ही निवडणुकीच्या काळात परवानगी मिळाल्यामुळे ती अंमलबजावणीत आणता आली नाही, सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या आश्वासनात हा मुद्दा एक महिन्याच्या आत पूर्ण करू आसे आश्वासन दिले होते परंतु ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. दुसरा मुद्दा म्हणजे पाणी प्रश्न आजही काही भागात आठ ते दहा दिवस पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत, मुबलक पाणी असतानाही सध्याची ग्रामपंचायत लोकांना पाणी देण्यात कमी पडत आहे, चांदणी चौकात लोकांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पाण्याचे एटीएम लोकांना उपलब्ध करून दिले परंतु केले काही महिन्यापासून बंद असल्यामुळे लोकांना हे पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन हे पाणी लोकांना उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली. सध्या सुट्ट्यांची व लग्न सराईचे दिवस असल्यामुळे मायणी बाजारपेठत गर्दी होत असून वाहने पार्किंग साठी रस्त्यावरच उभी केली जातात, आमच्या काळात बाजार पटांगणात पार्किंगची व्यवस्था केल्यामुळे काही प्रमाणात ट्राफिक वर कंट्रोल राहिले होते परंतु सध्याचे सत्ताधारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे जर बाजार पटांगणात पार्किंग केले तर रस्त्यावर वाहांनकोंडीचा प्रश्न उद्भवणार नाही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. याच मुद्द्यावर आम्ही सत्तेत असताना विरोधकांनी रान उठवले होते परंतु याच गोष्टीचा आता त्यांना विसर पडला की काय असे एक ना अनेक मुद्द्यावर सध्याच्या सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घेर ल्याचे काल पाहायला मिळाले अंतर्गत गटारी ची स्वच्छता या विषयावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आवगत करून दिले, सत्ताधारी सध्या आपल्याच वार्डात काम करत असल्याचा आरोप ही करण्यात आला . आमच्या काळात आम्ही सरसकट गटार स्वच्छता, विजेचे बल्ब बसवणे अशा गोष्टी करत होतो. पण सध्या गटाराची अस्वच्छता खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत असून पावसाळा तोंडावर आहे जर गटारी स्वच्छ नाही केले तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून राजकारण न करता सर्वच भागातील गटारी स्वच्छ करण्यात यावी अशी मागणी केली. आम्ही चांगल्या कामासाठी कायमच सत्ताधाऱ्यांचे बरोबर राहू आम्ही विरोधाला विरोध करणार नाही आणि कधी केला हे नाही त्यामुळे दिलेल्या आश्वासनाला जागृत राहून कामे पूर्ण करावी एवढीच अपेक्षा.
चौकट — चोवीस बाय सात योजना खऱ्या अर्थाने कोणी मंजूर करून आणली हे सर्व जनतेला माहीत आहे. डॉ दिलीपराव येळगावकर व मा सरपंच सचिन गुदगे यांच्या प्रयत्नामुळे सदर योजना मंजूर झाली ,मायणी ला कायमस्वरुपी पाणी व चोवीसतास पाणी ही सकल्पना राबवत ही योजना आखली,आणि मंजुरीही आली परंतु निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे त्याचे उद्घाघाटन राहून गेले,पण सत्ता आल्यानंतर दुसऱ्या दिवशी नारळ फोडून त्या कामाचा शुभरंभ करण्यात आला ,सर्व जनतेला माहीत आहे की २४/७ ही योजना कोणी मंजूर केली ते सांगण्यासाठी कोणत्याही कुडमुड्या जोतीष्याची गरज नाही.
(सुरज पाटील माजी उपसरपंच मायणी