ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-महामानव डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यात विविध कार्यक्रम सुरू.

प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी अजित जगताप सातारा

महामानव डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यात विविध कार्यक्रम सुरू.

सातारा दि: घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिकवणी व संघर्षाने अनेकांना आपल्या हक्काची जाणीव झाली आहे. त्यामुळे विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. तर काहींनी जागोजागी हार्दिक शुभेच्छा फलक लावून तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजनाची सुरुवात करून महामानवाला अभिवादन केले आहे.
सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजधानी होती. आज ही क्रांतिकारक विचार जोपासले जात आहेत. दि. ७ नोव्हेबर १८९६ रोजी बाल भिमाने म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सातारा येथील तात्कालीन सातारा हायस्कूल मध्ये शाळा प्रवेश केला होता. तसेच अनेकदा सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी भेट दिली आहे. शेड्युल कॉस्ट फेडरेशन व स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून साताऱ्यात त्याकाळी आमदार खंडेराव सावंत हे निवडून आले होते. त्यानंतर आतापर्यंत रिपब्लिकन पक्षाचे एक ही नेते आमदार होऊ शकले नाही. परंतु, इतरांना आमदार करण्यासाठी काही दलित व रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले आहे. आज ही इतर पक्षाच्या अजेंट्यावर काही महाभाग अद्याप ही काम करीत आहेत. त्यांनी ही जागोजागी फलक लावून सहभाग नोंदवला आहे.
विश्र्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण व खेड्यापाड्यात जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ध्वजारोहण, प्रबोधनात्मक कार्यक्रम, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, व्याख्याने, भव्य मिरवणूक व सांस्कृतिक व सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाला सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एक महिना डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महोत्सवानिमित्त समता, बंधुता, लोकशाहीचा गजर खेड्यापाड्यात केला जातो. यासाठी अनेक बांधव मोठ्या संख्येने सहकार्य करीत असतात. सामाजिक एकोपा निर्माण झाला आहे.
अलिकडच्या काळात वाढत्या प्रभावाने डिजिटल जुगलबंदीतून जागोजागी फलक, सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची प्रतिमा लावून विनम्र अभिवादन करून काही जण आपले कर्तव्य पार पाडत आहेत. तर काही कार्यकर्ते वैचारिक बांधिलकी स्वीकारून विविध विधायक उपक्रम राबवण्यात धन्यता मानत आहेत. त्यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
”या निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक व्हावे’ हे भीम गीत वाजविले जाते. पण, अनेक ठिकाणी गटबाजी चव्हाट्यावर आली असल्याचे दिसून येत आहे. आज सातारा जिल्ह्यातील सुमारे दीड हजार ठिकाणी विनम्र अभिवादन फलक लावून महामानवाला अभिवादन करण्यात आले आहे. त्यामुळे आंबेडकरी विचारांच्या प्रभाव सुद्धा दिसून आला आहे. त्याचे मतांमध्ये रुपांतर होणे अपेक्षित आहे असे स्पष्ट मत दलित पँथरचे कार्यकर्ते तसेच सामान्य फुले, शाहू, आंबेडकर चळवळ गतिमान करण्यासाठी झटणारे जुने कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करत जगा. हा संदेश देणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र दिशा दिली आहे. त्या मार्गाने आगेकूच करणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने काही महत्वाच्या सामाजिक संघटना काम करीत आहेत. चांगली विचार जोपासले जात आहेत. अशा पद्धतीने होणाऱ्या जयंती महोत्सवाला सुरुवात झाली असून त्यामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांचा पाठिंबा मिळू लागला आहे. हा क्रांतिकारक बदल सुद्धा पहाण्यास मिळत आहे. दिवसेंदिवस जयंती महोत्सवानिमित्त लोकांची संख्या वाढत आहे. अशा वेळी काही राजकारणी मंडळी सुद्धा सहभागी होताना दिसत आहे. त्यांचे ही स्वागत करण्यात येत असून काहींनी तर नेत्यांची छबी लावूनच फलकबा जी केली आहे. तो सुद्धा चर्चेचा विषय ठरला आहे.
—————————————————–
फोटो- सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात अशा फल काने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button