कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खटाव:-वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सुमारे दहा लाख रुपयांची उलाढाल.

प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सुमारे दहा लाख रुपयांची उलाढाल.
प्रतिनिधी:-अजित जगताप
वडूज दि: वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी गेल्या आठवड्याभरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये जागृती निर्माण झालेली आहे. सोमवार दिनांक 3 एप्रिलच्या अखेरच्या दिवशी या मतदारसंघात १७७ लोक व शेतकऱ्यांनी वडूज शेती उत्पन्न बाजार समितीसाठी सुमारे दहा लाख रुपये भरणा व खर्च केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुषमा शिंदे या कामकाज पाहत आहेत.
खटाव तालक्यातील सोसायटी मतदार संघातील ११ जागांसाठी ७२, ग्रामपंचायत मतदार संघासाठी चार जागांसाठी २२ ,सर्व साधारण अनुसूचित जाती जमाती एक जागेसाठी ५ व आर्थिक दुर्बल घटक एक जागेसाठी ९, व्यापारी- आडते दोन जागेसाठी १६, हमाल मापाडी एक जागेसाठी १३, महिला दोन जागेसाठी १३ , अशा १८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.१७७ एवढ्या विक्रमी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दि.५एप्रिल रोजी अर्जाची छाननी, दि.६एप्रिल वैध अर्ज आणि २१ एप्रिल रोजी अंतिम यादी त्यानंतर दि.२९एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
खटाव तालुक्यातील १०३ सोसायटी मधून १२८८,१३३ ग्रामपंचायत मधून ११५४ व व्यापारी- आडते-८४१, हमाल-९६४ मतदार आहेत. महागाई वाढली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी आंदोलन होत आहे. वडूज शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आर्थिक विकास घटल्याने शोककळा पसरली आहे. कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन नाही. अशा बिकट परिस्थिती विक्रमी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. कार्यकर्त्यांना संधी मिळाली तर तेवढेच त्याचे नाव होणार आहे. या व्यतिरिक्त हाती काही लागणार नाही. ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. अशी विनंती केली जात आहे. दुसऱ्या बाजूला काही नेतेगण कार्यकर्त्यांना अर्ज दाखल करण्यास भाग पाडत आहेत. ही वस्तुस्थिती पहाण्यास मिळाली आहे.
खटाव तालुक्यातील भाजप, शिवसेना, अपक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, काहींनी व्यक्तिगत पातळीवर अर्ज दाखल केले आहेत. यासाठी सुमारे दहा लाख रुपयांचा निधी अधिकृत रित्या झाला आहे. निवडणूक रिंगणात चुरस निर्माण झाली आहे. बिनविरोध निवडणूक होणे गरजेचे आहे. पण, शक्यता कमी आहे. यासाठी प्रबोधन करण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी प्रामाणिकपणे पुढाकार घेणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत डांबेवाडीचे माजी सरपंच कृष्णराव बनसोडे, दत्ता केंगारे, सचिन इंगळे, बाळासाहेब चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
——————+++++—————————–
फोटो – वडूज सहकार विभागाकडे अर्ज दाखल करण्यासाठी झालेली गर्दी (छाया – अजित जगताप)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button