खटाव:-चोराडे –“शेवटच्या गिरणी कामगाराला घर मिळेपर्यंत हा लढा असाच चालू राहील”
प्रतिनिधी सागर पिसाळ खटाव:-7875411591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
प्रतिनिधी सागर पिसाळ खटाव
खटाव:-चोराडे –“शेवटच्या गिरणी कामगाराला घर मिळेपर्यंत हा लढा असाच चालू राहील”
खटाव तालुक्यातील शेनवडी या गावी गिरणी कामगार तरुण स्वराज्य संस्थेचे उपाध्यक्ष तेजस कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली गिरणी कामगार व त्यांच्या वारसांचा मेळावा पार पडला.
यावेळी सातारा , सांगली परिसरातील बहुसंख्य गिरणी कामगार येथे उपस्थित होते.
यावेळी काहीही झाले तरी गिरणी कामगारांना मुंबई येथेच घरे द्यावीत अशी अन्यथा भविष्यात सर्व कामगार संघटना मिळून मोठा महामेळावा घेऊन सरकारला तो निर्णय घ्यायला भाग पाडू अशी भूमिका उपस्थित विविध गिरणी कामगार संघटना प्रमुखांनी केली…
“यावर्षी कोणत्याही परिस्थितीत गिरणी कामगारांविषयी धोरणात्मक निर्णय सरकारला घ्यायला लावू” – हेमंत गोसावी कृती समिती सेक्रेटरी यांनी भूमिका मांडली.
यावेळी आनंदजी मोरे यांनी “सरकारकडून कंजूरमार्ग येथील 200 एकर जागेच ची मागणी सरकारकडे करून त्या जागेवर गिरणी कामगारांना घरासाठी आराखडा तयार करण्यासाठी आपण आग्रही राहिले पाहिजे” अशी मागणी केली
“गिरणी कामगार समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांच्याशी सकारात्मक चर्चा होईल आणि ते गिरणी कामगाराना न्याय देतील अशी आशा बाळगली, आणि जोपर्यंत शेवटच्या गिरणी कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा अखंड चालू राहणार अशी ग्वाही तेजस कुंभार यांनी दिली
यावेळी सोबत च शेनवडी,चोराडे,विटा ,येतगाव व परिसरातील गिरणी कामगार व वारस उपस्थित होते…