सातारा:-साताऱ्यातील अंधा कानून झाला डोळस, पाच अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
साताऱ्यातील अंधा कानून झाला डोळस, पाच अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल.
सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा शहरात दररोज कायदा व सुव्यवस्थेची धिंडवडे निघत आहेत. अशा वेळेला सामान्य माणसांना न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे. शेवटी तक्रारदारांना न्यायालयात धाव घेऊन पाच अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले आहे. अखेर गुन्हे दाखल करण्याची नामुष्की ओढवली आहे.
याबाबत माहिती अशी की, साताऱ्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील लिपिक यांनीच मोटर वाहन निरीक्षक प्रकाश खटावकर व एजंट संतोष शिंदे यांच्या विरोधात कागदपत्रे चोरल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे तर जय भवानी नागरी पतसंस्थेच्या कारभारा प्रकरणी पतसंस्थेच्या सभासदांनी सहकार विभागाकडे तक्रार केली असून पुरावे देऊनही गुन्हा दाखल केले नाहीत. त्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व स.पो.नि. राजेश माने यांच्या विरोधात सातारा जिल्हा न्यायालयात जाऊन तक्रार दाखल करण्याचे आदेश आणले आहेत तर तिसरी घटना ही शिक्षण संस्थेची संबंधित असून गुन्हा अन्वेषण विभागाचे तात्कालीन पोलीस निरीक्षक व पुणे येथील पोलीस उपअधीक्षक पदी कार्यरत असलेले पद्माकर घनवट व विजय शिर्के यांच्या विरोधात खंडणी व जबरी चोरीसह विविध कलमाने सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
सदर प्रकरण हे सहा वर्षांपूर्वीचे असून या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचा अद्यापही तपास नसताना ज्यांच्या वर गुन्हे दाखल केले नाहीत अशा तक्रारदारांच्या तक्रारीनुसार आता पोलिसांच्या विरोधातच गुन्हे दाखल करण्याची नामुष्की ओढावली आहे. पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी तर २५ लाख रुपयांची खंडणी मागितली त्यापैकी बारा लाख तीस हजार रुपये स्वीकारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सदर प्रकरण गंभीर असूनही त्याची फारशी दखल घेतली नाही. अखेर सातारा न्यायालयाने सीआरपीसी १९७३ चे कलम १५६ ( ३) प्रमाणे या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दुसऱ्या प्रकरणातही १३ पदाधिकाऱ्यांवर प्रथम खबरी अहवाल नोंदवून घेण्याची कारवाईचे आदेश दिले आहेत.
सध्या सातारा शहरांमध्ये शिवसेना- भाजपची सत्ता असूनही सत्तेच्या माध्यमातून कारवाई होत असल्याने सामान्य नागरिकांना समाधान व्यक्त केले आहे. यापूर्वी अनेक प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत. परंतु तक्रारदार हे आर्थिक सक्षम नसल्याने त्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही. त्यांना न्याय देण्यासाठी सातारचे सुपुत्र व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच लक्ष घालावे अशी मागणी होऊ लागलेली आहे. दरम्यान, सदर पाच अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली असून यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हा अन्वेषण विभाग व इतर विभागातील अधिकाऱ्यांच्या विरोधात काहींनी कमेंट केली होती. त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. परंतु, आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने सर्वत्र नवल वाटत आहे. हा बदल एका रात्रीत झाल्याचे बोलले जात आहे.
सातारा शहर व परिसरात वाढत्या गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दमदार पाऊल टाकले असून गुन्ह्याचे तपास करण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच सामान्यांना न्याय मिळू लागल्याने खऱ्या अर्थाने सातारा शहरात शिवशाही अवतरलेचे बोलले जात आहे. याबाबत अधिक माहिती देण्यास संबधितांनी नकार दिला असला तरी सदरचे प्रकरण फार गंभीर असून ज्यांच्याकडे तपासाची सूत्र आहेत त्यांनीच सहकार्य करण्याचे धाडस दाखविले नाही. त्यामुळे साताऱ्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी होऊ लागलेली आहे. साताऱ्यातील सागर लाळगे, शंकर माळवदे, राजेंद्र चोरगे यांनी ही तक्रार दाखल केली असून प्रथम दर्शनी न्याय मिळाला असल्याचे बोलले जात आहे.