औरंगाबादःनूकतेच जेलमधून सुटलेल्या महिलेने गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा.
प्रतिनिधी अमोल चव्हाण गंगापूर:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
औरंगाबादः जेलमधून नुकतेचच बाहेर आलेल्या महिलेने भावाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घराजवळ राहणाऱ्या दुकानदारानी त्याला मारहाण केल्याची तक्रार केल्याने हरसुल कारागृहात पंधरा दिवस राहिल्याने तणावात आलेल्या महिलेने भावाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. ही घटना तिसगाव येथे उघडकीस आली सुनिता सुनील चौतमळ वय 30 राहणार मातोश्री नगर गारखेडा असे आत्महत्या करणाऱ्या महिलेची नावे दरम्यान दुकानदारास अटक होईपर्यंत सुनीताचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा तिच्या नातेवाईकानी घेतला यावर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनिता चौतमल ने मंगळवारी तिसगाव येथे राहणाऱ्या तिच्या भावाच्या घरी छताच्या लोखंडी पाईपला साडी बांधून गळफास घेतला ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर सुनिताला घाटी रुग्णालयात दाखल केली असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले दहा नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी सुनीता जय भवानी नगरातील दुकानदार संजय धर्मे यांच्याकडे दोन हजार रुपये उसने मागायला गेली होती त्याने नकार दिल्याने दुसऱ्या दिवशी तिच्या ओळखीचा सौरभ मगराळे हा दुकानदाराकडे गेला दरम्यान सौरभने दुकानदाराला तू उसने पैसे का दिले नाही म्हणून मारहाण केली याप्रकरणी दुकानदार धर्मे यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि सुनीता चे नाव देखील आरोपी म्हणून दाखल केले त्यामुळे दोघांना अटक केली आणि कोर्टात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती तेव्हा सुनिताने मला खोट्या गुन्हा अडकवल्याचे आरोप करत कोर्टात गोंधळ घातला तिला पंधरा दिवस कारागृहात ठेवण्यात आले त्यानंतर ती बाहेर आल्यावर तिने गळफास घेतला.
गंगापूर तालुका प्रतिनिधी अमोल चव्हाण