ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रत्नागिरी:-1 जानेवारीला रत्नागिरीत वंजारी सेवा संघाचे होणाऱ्या दशकपूर्ती मेळाव्यासाठी समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आव्हान.

प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-7447520147

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

कोकण विभागाचे पुढाकाराने दि.१ जानेवारीला रत्नागिरीत वंजारी सेवा संघाचे होणाऱ्या दशकपूर्ती मेळाव्यासाठी समाज बांधवांनी उपस्थित रहावे :~संस्थापक अध्यक्ष राहुल जाधववर यांचे आव्हान

नाशिक [पत्रकार चंद्रशेखर कापसे/९४२१४०३१५५ नाशिक]

कोकण विभागाचे पुढाकाराने वंजारी समाजाचा राज्यस्तरीय समाज मेळावा आणि वंजारी सेवा संघाचा दशकपूर्ती सोहळा हा संयुक्त कार्यक्रम कोकण विभागातील रत्नागिरी येथील वीर सावरकर नाट्यगृहात रविवार दि १ जानेवारी 2023 रोजी सं.९:००वा. समाजातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून संपन्न होणार असल्याने राज्यातील समाज बांधवांनी आणि वंजारी सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन हा दशकपूर्ती सोहळा यशस्वी करावा असे आव्हान वंजारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री राहुल जाधववर आणि संघाचे राज्य कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे यांनी एका प्रसिद्ध पत्रकारद्वारे केले आहे.
वंजारी सेवा संघाच्या दशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने 2022 मधील समाजातील विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा विशेष सन्मान मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती सेवा संघाचे राज्य कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे यांनी सांगितले आहे या दशकपूर्ती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मराठवाड्यातील अभ्यासू आणि लोकनेते मुंडे साहेबांचे विश्वासू सहकारी माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे यांच्या उपस्थितीत आणि भटके विमुक्त चळवळीचे अभ्यासक भारत सरकारच्या निती आयोगाचे सदस्य दादा इदाते,ओबीसी चळवळीचे नेते माजी आमदार डॉ नारायण मुंडे, बुलढाण्याचे माजी आमदार तोताराम कायंदे,ओबीसी राष्ट्रीय चळवळीचे समन्वयक राजेंद्र राख,ओबीसी चळवळीचे राज्य समन्वयक अरुण खरमाटे भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद दादा कराड लातूरच्या माजी उपनगराध्यक्ष डॉ दीपाताई गीते, संस्थापक राज्याध्यक्ष राहुल जाधववर राज्य कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे प्रदेश महासचिव बाजी दराडे वंजारी सेवा संघ महिला अध्यक्ष डॉ मंजुषा दराडे राज्य कार्याध्यक्ष सविताताई मुंडे कोकण विभागाचे अध्यक्ष मोहन नागरगोजे वंजारी सेवा संघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री ज्ञानेश्वरभाऊ शिरसाट अदि मान्यवरांच्या उपस्थितीत हा दशकपूर्ती सोहळा व वंजारी समाजाचा राज्यस्तरीय मेळावा संपन्न होणार आहे.
वंजारी सेवा संघ महाराष्ट्रातील एक अग्रगण्य राजकारण विरहित काम करणारे वंजारी समाजाचे एक सशक्त संघटन असलेला सेवाभावी संघ आहे वंजारी सेवा संघाची स्थापना 2012 यावर्षी संत भगवान बाबांच्या गडावर करण्यात आलेली आहे राष्ट्रधर्म अध्यात्म समाजसेवा समाज जनजागरण समाजशिक्षण या पंचरंगी विचारांनी आणि संत वामन भाऊ संत भगवान बाबा संत आवाजिनाथ आणि स्वर्गीय मुख्यमंत्री वसंतराव नाईक लोकनेते गोपीनाथराव मुंडे क्रांतिवीर वसंतराव नाईक या महापुरुषांच्या आदर्श विचारांचा वारसा घेऊन राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये सक्रिय संघटन असलेले वंजारी सेवा संघाचे आदर्श असे काम तालुका गाव स्तरावर चालू असल्याने समाज बांधवांना संघटित करणारे वंजारी सेवा संघ एक सशक्त विचारांची चळवळ आहे यात जिल्हा तालुका गाव स्तरावरील विविध उपक्रम राबवणारी समाजातील सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय कृषी उद्योग कला साहित्य अशा विविध क्षेत्रात काम करणारे समाज बांधवांचे सशक्त विचारांचे समाज संघटन असलेले वंजारी सेवा संघ राज्यभरात काम करत असल्याची माहिती राज्य प्रसिद्ध प्रमुख पत्रकार संतोष कांदे व युवा आघाडीचे राज्याध्यक्ष प्रकाश आव्हाड यांनी दिली आहे
वंजारी सेवा संघाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात श्री क्षेत्र भगवानगड औरंगाबाद बीड मुंबई आळंदी लातूर जालना नाशिक पुणे नागपूर नंदुरबार बुलढाणा वर्धा परभणी हिंगोली रत्नागिरी ठाणे अदि जिल्ह्यामध्ये गुणगौरव वधू वर समाज मेळावे समाज उपक्रम उद्योजकीय शिबिरे अशा विविध माध्यमातून गेल्या दहा वर्षा पासून वंजारी सेवा संघ काम करत आहे यंदा या संस्थेला दहा वर्षे पूर्ण होत आहे या संस्थेच्या माध्यमातून भटके विमुक्त ओबीसी चळवळीमध्ये सक्रिय सहभागी होऊन महाज्योतीच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलनात्मक भूमिका घेऊन राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून समाज बांधवांना एक सकारात्मक न्याय मिळवून दिला आहे अशी माहिती वंजारी सेवा संघाचे प्रवक्ते शशिकांत घुगे आणि दिनेश केकान यांनी याप्रसंगी पत्रकाद्वारे सांगितले आहे

वंजारी सेवा संघाच्या दशकपूर्ती निमित्ताने राज्यातील वंजारी समाजातील गुणवंत ज्ञानवंत आणि कीर्तीवंत समाज बांधवांचा खास सन्मान या निमित्ताने १ जानेवारी रोजी रत्नागिरीच्या वीर सावरकर नाट्यगृहात कोकण विभागाच्या वतीने रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग बृहन्मुंबई विभागाने दशक पूर्ती सोहळ्याचं यजमानपद स्वीकारले असल्याची माहिती कोकण विभागाचे अध्यक्ष मोहन नागरगोजे यांनी दिली
यात सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अच्युतराव वनवे रायगड जिल्हाध्यक्ष गोरख आघाव रत्नागिरी जिल्हाध्यक्ष नागेश जाधववर आदींच्या नेतृत्वाखाली हा दशकपूर्ती सोहळा संपन्न होणार असल्याचे सांगण्यात आले या दशकपूर्ती सोहळ्यासाठी समाज बांधवांनी आणि विशेष करून उत्तर महाराष्ट्र कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्र विदर्भ व मराठवाडा विभागातील वंजारी सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे तसेच त्या त्या विभागातील मान्यवरांच्या सन्मान सोहळ्यासाठी सत्कारमूर्तींना पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्याची जबाबदारी घ्यावी असे आव्हान उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर शिरसाठ कार्याध्यक्ष तुकाराम सांगळे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख चंद्रशेखर कापसे सरचिटणीस गोरख आखाडे उत्तर महाराष्ट्र संघटक आजिनाथ आघाव संजय कापसे उद्योजक घनश्याम हेंबाडे डॉ धर्मेंद्र पालवे आप्पा बुटे पंडितांना काळे शैलेंद्र चकोर शिवाजी बडे नाशिक जिल्हाध्यक्ष अँड. निलेश सानप नंदुरबार जिल्हा अध्यक्ष केतन गीते अर्चना काकडे जळगाव अध्यक्ष लक्ष्मणराव वंजारी अदिनी केले आहे.
*(कृपया आपल्या लोकप्रिय वेबपोर्टल/ दैनिकात चैनल ला प्रसिद्धीसाठी घ्यावी ही नम्र विनंती आपला नम्र पत्रकार चंद्रशेखर कापसे वंजारी सेवा संघ उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख व प्रसिद्ध प्रमुख @9421403155 )*

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button