नवी मुंबई:-रात्रीच्या वेळेस तुर्भे वाशी नवी मुंबई येथून एकाच वेळी दहा ते पंधरा रिक्षांचे टायर चोरीस.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
दिनांक:-20/12/2022.च्या रात्री तुर्भे वाशी नवी मुंबई येथून एकाच वेळी दहा ते पंधरा रिक्षांचे टायर चोरीस.
नवी मुंबई रिक्षा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. कासम भाई मुलाणी आणि अध्यक्ष मा.श्री.मच्छिंद्र तांडेल यांनी या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एपीएमसी पोलीस ठाणे वाशी नवी मुंबई यांना या चोरी विषयी निवेदन दिनांक 22/12/2022 रोजी रिक्षा चालक मालकांसह दिलेले आहे. तातडीने या टायर चोरी करणाऱ्या टोळीला गजाळ करण्याची मागणी सर्व रिक्षा चालक-मालक यांनी केले आहे. अशा प्रकारच्या चोऱ्या होत असताना पोलीस प्रशासन काय करत असते. एकाच वेळी दहा पंधरा गाड्यांच्या टायरची चोरी होतीच कसे? असे परखड प्रश्न माननीय कासम मुलाणी यांनी व्यक्त केले आहे. गोरगरीब रिक्षा चालक मालकांना तातडीने न्याय मिळवून द्यावा आणि या चोरीतील आरोपींना तातडीने ताब्यात घेऊन कारवाई करावी आणि चोरीला गेलेल्या टायर ताब्यात घेण्यात यावेत. अशी मागणी सर्व रिक्षा चालक मालक यांनी केलेले आहे.