पुणे पिंपरी:-पिंपरी चिंचवडकरांच्या हक्काच्या मागण्यांसाठी आम आदमी पार्टीचा जन आक्रोश मोर्चा.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
पिंपरी चिंचवडकरांच्या हक्काच्या मागण्यांसाठी
आम आदमी पार्टीचा जन आक्रोश मोर्चा.
पिंपरी, दि. 25 (शफिक शेख):- आम आदमी पार्टीच्या वतीने आज मोरवाडी कोर्ट ते पिंपरी चिंचवड महानगरपालिके वर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. एकमेकांवर चिखलफेक करून जनतेच्या डोळ्यात धूळ टाकणाऱ्या पक्षाना जनतेने धडा शिकवला पाहिजे. भ्रष्ट कारभाराचा चिखल आम आदमी पार्टीचा झाडू हाती घेऊन साफ करण्याची वेळ आली आहे, अशी टीका आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी मनपा भवनासमोर आयोजित मोर्चामध्ये केली.
या जनआक्रोश मोर्चाची सुरवात पिंपरी कोर्ट मोरवाडी चौकातून झाली.खालील विविध मागण्या आम आदमी पार्टीतर्फे करण्यात आल्या. 1) शहरात मोठ्या प्रमाणात मोहल्ला(जिजाऊ) क्लिनिक सुरू करा. 2) मनपाच्या सर्व रुग्णालयात जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) प्रमाणित केलेली सर्व जीवरक्षक व आवश्यक औषधे मोफत उपलब्ध करून केसपेपर शुल्क माफ करा. 3)मनपाच्या सर्व रुग्णालयात लहान मुलांचे(NICU) शिशु अतिदक्षता विभाग सुरू करा. 4)वाय सी एम मधील जळीत वॉर्ड त्वरित सुरू करा. 5) मनपाच्या 50 % शाळांमध्ये इंग्रजी माध्यम पाठ्यक्रम सुरू करून किमान 10 शाळा येत्या 2022/23 शैक्षणिक वर्षांमध्ये सेंटर ऑफ एक्सलान्स मॉडेल शाळा सुरू करा. 6) घरेलू महिला कामगारांचे सर्वेक्षण करून त्यांना पालिकेच्या वतीने कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्या. 7) PMPL मध्ये महिलांना मोफत प्रवासी सुविधा द्या. 8)पूर्णत्वाचा दाखला मिळालेला 2016 नंतरच्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या कंपोस्टिंग युनिटचा खर्च बिल्डर कडून वसूल करून द्या. 9)शहरातील प्रत्येकाला शासकीय घरकुल योजना उपक्रमातील वाटप झालेल्या सर्व घरांचा ताबा द्या. 10) वाढीव मालमत्ता शुल्क हस्तांतर शुल्क रद्द करा
मोर्चाच्या शेवटी महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या भोंगळ कराभाराचा भ्रमाचा प्रतीकात्मक फुगा फोडून निषेध करण्यात आला. यावेळी चेतन बेंद्रे, अनुप शर्मा, राज चाकणे, यशवंत कांबळे, मनोहर पाटील, ज्योती शिंदे, संतोषी नायर, ब्रम्हानंद जाधव, मंगेश आंबेकर, स्मिता पवार, यल्लप्पा वालदोर, शुभम यादव, सरोज कदम, स्वप्नील जेवळे, गोविंद माळी, प्रवीण शिंदे, आशुतोष शेळके, अजय सिंह, रोहित सरनोबत, राजेश सापरे, ओमीन गायकवाड, अजिनाथ सकट, सुंदर ओव्हाळ, महेश पाटील, वहाब शेख, सुरेंद्र कांबळे, चंद्रमनी जावळे, सर्फराज मुल्ला, मीनाताई जावळे, संजय मोरे, सचिन पवार, वाजीद शेख, संतोष राऊत, अशोक नांगरे, दमयंती नेरकर आणि शहरतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.