पुणे निगडी:-अखेर मुख्यमंत्र्यांची ‘‘दिवाळी भेट’’ महाराष्ट्राच्या जनतेला प्राप्त झाली!
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
…अखेर मुख्यमंत्र्यांची ‘‘दिवाळी भेट’’ महाराष्ट्राच्या जनतेला प्राप्त झाली!
निगडी, दि. 31 (शफिक शेख):- महाराष्ट्रातील जनतेला वाढत्या महागाईमुळे आणि बुडत्या रोजगारापासून काहीसा दिलासा मिळावा आणि त्यांची दिवाळी ही दिलासादायक व्हावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे 25 दिवसांपूर्वी दिवाळी भेट म्हणून 513.24 कोटी रूपये खर्च करून 100 रूपयांमध्ये 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 लिटर पाम तेल आणि 1 किलो चणाडाळ देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यातील जनतेला आनंद प्राप्त झाला होता. त्या ‘‘भेटी’’ची वाट पाहत पाहत दिवाळी पूर्ण निघून गेली. आज उद्या करीत करीत दिवाळीच्या 5 दिवसानंतर आज दि. 31/10/2022 रोजी सर्व स्वस्त अन्नधान्य दुकानांमध्ये भेट पूर्णपणे पोहोचली. त्यामुळे राज्यातील जनतेने अन्नपुरवठा विभागाच्या या ‘‘अतुलनीय’’ कामगिरीबद्दल आभार व्यक्त केले आहे.
सर्व परिमंडळ अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या संपर्कामध्ये आमचे प्रतिनिधी होते. परंतु वेळेची कमतरता, मनुष्यबळ कमी, बायोमेट्रिक मशिनची अकार्यक्षमता, सरकारी कर्मचारी यांचा वेळकाढूपणा अशी अनेक कारणे सर्व विभागांचे परिमंडळ अधिकारी हे देत होते. शेवटी हो नाही करता करता आज रोजी सर्व स्वस्त अन्नधान्य दुकानांमध्ये पूर्ण साठा पोहोचला. त्यानंतर दुकानदारांच्या कार्यक्षमतेची कसोटी लागली. अगोदरच प्रत्येक किटमागे कमिशन कमी आणि त्यामागे होणारा खर्च जास्त यामुळे दुकानदारही हतबल झाले आहेत.
सेक्टर नंबर 22, रूपीनगर, निगडी, पुण्यातील सोमवार पेठ, मंगळवार पेठ, हडपसर येथेही संपर्क साधला असता त्यांचीही परिस्थिती वेगळी नव्हती. दुकानदारांनी सांगितले की 5 ते 6 दिवसांमध्ये सर्व किटचे वाटप आणि दर महिन्याचे धान्य हे देण्यात येईल. या सर्व प्रकरणामध्ये खरंच अन्नपुरवठा विभागाची अकार्यक्षमता दिसून आली जी अतिशय दयनीय अशी आहे. साधे एक दिवाळी भेट ते नागरिकांना दिवाळी आधी पोहोचू शकले नाही. त्यामुळे नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होताना दिसून आली.