वाई:-ब्लॉसम चिल्ड्रन्सअकॅडमी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
सह - संपादक अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
सह – संपादक अशितोष चव्हाण
ब्लॉसम चिल्ड्रन्सअकॅडमी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
वाई : ओम साई एज्युकेशन सोसायटीच्या ब्लॉसम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन 13जानेवारी 2024रोजी धनश्री मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाले. पूर्वप्राथमिक व प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या सर्व विद्यार्थ्याचा या संमेलनामध्ये सहभाग होता. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री बाळासाहेब भरणे (P.I. Wai)उपस्थित होते. संमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि स्वागतगीताने झाली.याप्रसंगी शालान्त तसेच विविध स्पर्धांत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे श्री. बाळासाहेब भरणे यांनी शाळेची थीम सादरीकरणा ची परंपरा व दरवर्षीच्या नवनवीन संकल्पनांचे कौतुक करताना मुलांचा शंभर टक्के असलेला सहभाग याचे भरभरून कौतुक केले. याप्रसंगी ते म्हणाले ‘ मुलांची शिकण्याची प्रक्रिया ही सहज होत असते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेतील सर्व उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असतात. शाळेचे वातावरण हे मुलांना आयुष्यभर प्रेरक ठरते; म्हणून ते जपायला हवे”
संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजी शिंदे सर पालकांशी संवाद साधताना म्हणाले
शिक्षण म्हणजे मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणे व त्यांच्या सूक्त गुणांचे संवर्धन करणे आणि या संवर्धन केलेल्या गुणांना व्यासपीठ देणे आणि हे सर्व होते ब्लॉसम स्कूलमध्ये.
या संमेलनाचे औचित्य साधत
प्रिय विद्यार्थी, शिक्षकांना आणि आलेल्या सर्व पाहुण्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या .
वार्षिक स्नेहसंमेलनाची यावर्षीची संकल्पना ‘”कलाविष्कार’ ” ही होती.
विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी, विविध भाषिक, प्रादेशिक विभिन्नता दर्शवणारी नृत्यगीते सादर केली. या कार्यक्रमांमध्ये थीम डान्स या संकल्पने अंतर्गत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ थीम साँग द्वारे
स्वतःचे विस्मरण अणि भगवंताचे स्मरण हेच खरे
भक्तीचे रहस्य हा संदेश दिला.
महाराष्ट्राची लोकधारा द्वारे सांस्कृतिक लोकपरंपरा साजरी करण्यात आली. संगीत, नृत्य आणि कलेद्वारे, राज्याचा समृद्ध वारसा आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक अभिव्यक्ती ने प्रेक्षकांना मोहित केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण रामायण थीम सॉंग हे होते.
मुलांनी या नाटिकेद्वारे रामायण कथापट नृत्य व अभिनय याद्वारे सादर केला.
रामायण सर्वांना चांगले कर्म करण्याचे आणि नेहमी इतरांना मदत करण्याचे महत्त्व शिकवते. आपण नेहमी चांगल्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे कारण शेवटी चांगल्याचाच विजय होतो आणि वाईटाचा पराभव होतो. आपल्याला प्रभु श्रीरामांच्या स्वभावाची प्रेरणा मिळू शकते. अनेक संकटानंतरही रामाने शेवटपर्यंत आपला चांगला स्वभाव सोडला नाही हा संदेश प्रतीत झाला.
उपस्थित पालक व पाहुणे यांनी या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.
या कार्यक्रमप्रसंगी पाचगणी येथील श्री व सौ भारत पुरोहित,
श्री व सौ राजेंद्र पार्टे, श्री किरण पवार, मिस आलिया खान, सौ संगीता पाटील, सौ प्रेरणा भगत उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ. सारिका सपकाळ यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती सांगून अहवाल सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सौ. मानसी घाडगे , विद्यार्थीनी प्रचिती देशमुख , राधिका मुळे यांनी केले. संमेलनासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन मुख्याध्यापिका सौ सारिका सपकाळ, कॉर्डिनेटर सौ प्रीती फडके ,सौ मानसी घाडगे ,सौ कविता पाटील यांनी केले.
याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजी शिंदे सर ,सचिव श्री अमोल चौगुले, संस्था विश्वस्त सौ मनीषा शिंदे, ओमकार शिंदे ,
विद्यार्थी, पालक आणि शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.