ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-देशभक्त किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर यांची ११७ वी जयंती मा.मदनदादा भोसले यांच्या हस्ते उत्साहात साजरी.

प्रतिनिधी वैष्णवी शिंदे:-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

प्रतिनिधी वैष्णवी शिंदे:-9146802009.

देशभक्त किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर यांची ११७ वी जयंती मा.मदनदादा भोसले यांच्या हस्ते उत्साहात साजरी.

वाई : सातारा जिल्यातील यशवंत नितीच्या राजकारणाचे कर्णधार म्हणून क्रांतीवीर आबासाहेब वीर यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या धाडसी व्यक्तिमत्वाचा राज्याच्या पटलावर उमटलेला ठसा त्यांच्या कर्तबगारीची महती दर्शवणारा आहे. असे प्रतिपादन प्रा-. रमेश डुबल यांनी वाई येथे केले-
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात देशभक्त आबासाहेब वीर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रा- डुबल बोलत होते-
पुढे बोलताना प्रा. डुबल म्हणाले, स्वातंत्रपूर्व काळात जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीत आबांनी आपली ताकद बाळासाहेब देसाई यांच्या पाठीशी उभी करून त्यांना अध्यक्ष होण्यामध्ये जी भूमिका बजावली तेव्हापासून ते जिल्ह्याचे नेते झाले. यशवंतराव चव्हाण जिल्ह्यात आल्यानंतर जाहीरपणे सांगत की मी देशात गेलो की जिल्ह्याचा नेता असतो परंतु सातारा जिल्ह्यात आल्यानंतर आबा माझे नेते असतात. १९४२ च्या चले जाव घोषणेनंतर अवघ्या दोन महिन्यात सातारा जिल्ह्यात जे अभूतपूर्व आंदोलन उभे राहिले विशेषत: तासगाव, वडूज, इस्मामपूर, कराड व पाटण येथील मोर्चे आयोजित करण्यात किसन वीरांनी यशवंरावांना मोलाची मदत केली. स्वातंत्र्यानंतर यशवंतरावांच्या राजकारणाला पूरक भूमिका घेतल्यामुळे पंचायतराज, सहकार व पक्ष संघटना याबाबतीत सातारा जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर ठरला याचे श्रेय किसन वीरांना जाते. परंपरागत घराणी सोडून सामान्य घरातील कार्यकर्त्याना आणून राजकारणात आणून स्थान दिले. त्यामुळे आबा हे सर्वसामान्यात लोकप्रिय झाले. सातारा शहरात छत्रपती शिवाजी महाराज व यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर किसन वीरांचा पुतळा उभा राहणे हे त्यांच्या उत्तुंग कार्याचे प्रतिक दिसते. यशवंतरावांचे सुद्धा किसन वीरांच्यावर नितांत प्रेम होते. यशवंतराव म्हणत संग्रामातला साथी आणि खाजगी जिवनातला मित्र किसनवीरांसारखा शोधू गेलो तरी सापडणार नाही.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात आबासाहेब वीर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. आपल्या भाषणात त्यांनी आबासाहेब वीर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याची महती सांगितली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्था] वाई चे सचिव मा. डॉ. जयवंत चौधरी हे होते. याप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे खजिनदार नारायणराव चौधरी यांचीही प्रमुख उपस्थिती होती. प्र.प्राचार्य प्रा. डॉ. सुनील सावंत यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले, उपप्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे यांनी आभार मानले. डॉ. मंजुषा इंगवले यांनी सुत्रसंचालन केले.
कार्यक्रमास किसन वीर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button