ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुसेसावळी जि प गटात मात्तब्बर नेत्यांमध्ये होणार सामना::-राष्ट्रवादीला बंडाळीचा धोका तर कदम गटाला कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न.

प्रतिनिधी:-नितीन कुलकर्णी:-9921778417

पुसेसावळी जि प गटात मात्तब्बर नेत्यांमध्ये होणार सामना::-राष्ट्रवादीला बंडाळीचा धोका तर कदम गटाला कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न.
______________________________
पुसेसावळी

पुसेसावळी जिल्हा परिषद गट आणि पूसेसावळी, म्हासुर्णे या दोन्ही पंचायत समिती गणात सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्याने यावेळी मात्तब्बर नेत्यांमध्ये सामना रंगणार आहे, राष्ट्रवादीला बंडाळीचा धोका,तर कदम गटाला कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडला आहे, माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मतदारसंघात या गटाचा समावेश असल्याने आणि राष्ट्रवादी नंतर काँग्रेस, शिवसेना असा प्रवास करून सध्या आमदार जयकुमार गोरंच्या संपर्कात असणारे वर्धन एग्रो कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम यांचे गोरेगाव वांगी हे गाव या गटात असल्याने यावेळी निवडणुकी मध्ये चांगलीच रंगत येणार आहे, तब्बल तीन पंचवार्षिक जिल्हा परिषद गटाचे सर्वसाधारण आरक्षण लागले नव्हते त्यामुळे यावेळी सर्वसाधारण आरक्षण लागणार या आशेने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधत गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकीची तयारी केली आहे, पुसेसावली जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादाची मजबूत आणि भक्कम फळी आहे अनेक ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत तर पंचायत समितीचे सभापती पद गेल्या वेळी रेखा घार्गे आणि जयश्री कदम यांच्या माध्यमातून या गटाला मिळाले आहे, याचं गटात बाजार समितीचे सभापती पद सी एम पाटील यांच्याकडे होते,त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत, जितेंद्र पवार, चंद्रकांत पाटील, बबनराव कदम, सुहास पिसाळ, यांच्या सारखे अनुभवी आणि मुरब्बी नेते राष्ट्रवादीच्या तंबूत आहेत, मात्र राष्ट्रवादीची बंडाळी ऐन वेळी पराभवाला कारणीभूत ठरत असल्याने धैर्यशील कदम यांनी या गटात आपला वरचष्मा ठेवण्यात यश मिळवले आहे, मागील जिल्हा परिषद पंचवार्षिक निवडणुकी मध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे आणि जितेंद्र पवार यांच्या मध्ये समन्वय न झाल्याने घार्गे पवारांचां पराभव करून धैर्यशील कदम यांच्या पत्नी सुनीता कदम यांनी विजय मिळवला होता,यावेळी मात्र हीच चूक पुन्हा घडल्यास राष्ट्रवादीच्या हातातून हा गट निसटण्याची शक्यता वर्तवली जात आहे,राष्ट्रवादी मधून सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक संतोष शिदोजिराव घार्गे, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्रदादा पवार, बाजार समितीचे माजी सभापती सी एम पाटील, मागील जिल्हा परिषद निवडणुकीत म्हत्वाची भुमिका बजावलेले चोराडेचे युवा नेते सुहास पिसाळ,उदय गुरव, यांच्या नावाच्या चर्चा आहेत तर धैर्यशील कदम यांचे बंधू विक्रमशिल कदम यांनी गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकीची तयारी केली आहे, मात्र यावेळी कदम गट कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.मागील जिल्हा परिषद गटातील आमदार जयकुमार गोरे यांना मानणारी गावे,कदम गटाची मोठी ताकद होती,परंतु ती गावे औंध गटात गेल्याने कदम गट विचारात पडला आहे, आमदार जयकुमार गोरे यांची ताकद व माजी आमदार प्राभाकर घार्गे यांची जवळीक त्यामुळे कोणाला जवळ घ्यायचे या विचारात कदम गट आहे.पंचायत समिती चे पुसेसावळी आणि म्हासुर्णे गणात यावेळी चांगलीच चुरस पाहायला मिळेल, पुसेसावळी, वडगाव, राजाचे कुरले,पारगाव, गोरेगाव ,अशी मोठी आणि प्रमुख नेत्यांची गावे या गणात आहेत तर म्हासूर्णे गणात म्हासुर्णे आणि चोराडे या दोनच गावात सामना होण्याची दाट शक्यता असून राष्ट्रवादी आणि कदम गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या गणात चोराडे गावचे युवा नेते सुहास पिसाळ म्हासूर्ने गावचे सरपंच सचिन माने रहटनीचे माजी सरपंच संभाजी थोरात उंचिठणे गावचे माजी सरपंच सतीश शिंदे ,लाडेगावचे दिलीप यादव,यांची नावे चर्चेत आहेत तर पुसेसावळी गणात राजाचे कुरले गावचे सरपंच समरजित राजे भोसले,अनिल माने, पुसेसावळीचे माजी उपसरपंच अशोक कदम, माजी ग्रा प सदस्य अमोल कदम, महेश पाटील, संग्राम पाटील, गोरेगावचे योगेश शिंदे, पारगावचे विकास पवार, श्रीनिवास पवार, सुहास शिंदे,यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे.कदम गटातील पंचायत समितीचे गणातील उमेदवारांची चाचपणी सुरू असून,कदम गटातून म्हासुर्णे गणात पैलवान तुषार सुर्याजी माने यांचे नाव चर्चेत आहे, परंतु राष्ट्रवादीतील नाराजांना बरोबर घेऊन धैर्यशील कदम पुढील राजकीय आखाडे बांधण्याच्या तयारीत आहेत. धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा अनेक कार्यक्रमातील एकत्रित सहभाग आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये कोणती रंगत आणणार हे अजूनही स्पष्ट नसले तरी राष्ट्रवादीला यावेळी सावध भूमिका घेत पक्षातील बंडाळी रोखावी लागणार आहे,मात्र पुसेसावळी जिल्हा परिषद गटाची लढाई तिरंगी होण्याची दाट शक्यता आहे,माजी आमदार प्राभाकर घार्गे यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे,आणि धैर्यशील कदम गट कोणता झेंडा हातात घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, पुसेसावळी जिल्हा परिषद गटात तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे चांगलीच चुरस निर्माण होणार असल्याने चित्र सध्या तरी दिसत आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button