ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर बेलापूर रोडवरील अतिक्रमणामुळेच अपघातात नायगाव येथील आदिवासी कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू! या अतिक्रमणधारकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या वारसांचे पुनर्वसन करावे ,अन्यथा पाच ऑगस्टपासून एकलव्य सेनेचे उपोषण!

प्रतिनिधी:- कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

लोहगाव(प्रतिनिधी)
श्रीरामपूर तालुक्यातील श्रीरामपूर बेलापूर रोडवर   रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर दुकाने थाटून मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत अडथळा निर्माण होईल असे अतिक्रमण करण्यात आले असून अशा अतिक्रमणां मुळे  आदिवासी समाजातील नायगाव येथील  तीन      जणांचा अपघातात मृत्यू झाला असून या अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या येथील अतिक्रमण धारकांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा या व इतर मागणीसाठी एकलव्य भिल्ल सेनेच्या वतीने तालुक्यातील समाज शुक्रवार दिनांक 5 ऑगस्ट 22 दुपारी बारा वाजेपासून श्रीरामपूरच्या प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर आहिरे .प्रदेशाध्यक्ष कैलास माळी यांनी दिला आहे.
प्रसिद्ध पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की ,श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर श्रीरामपूर रोडवर   रस्त्यालगतच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे रस्त्यावर जाणाऱ्या मोठ्या अडचण निर्माण होत आहे. व अडचणीच्या मुळेच   नायगाव येथील आदिवासी समाजातील तीन जणांचा   अपघात होऊन त्यामध्ये ते मृत्युमुखी पडलेले आहे. त्यांचे कुटुंब उघड्यावर आलेले आहे. त्यामुळे त्यांच्या अपघातास व मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या श्रीरामपूर बेलापूर रोडवरील  अतिक्रमण धारकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. त्याचप्रमाणे श्रीरामपूर बेलापूर रोडचे काम अपूर्ण ठेवून लोकांच्या जीवना बरोबर खेळणाऱ्या सार्वजनिक विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना सहआरोपी करून त्वरित बडतर्फ करावे. श्रीरामपूर बेलापूर रोडवरील अतिक्रमण हटवुन या रोडचे काम त्वरित सुरू करावे. नायगाव येथील पीडित आदिवासी भिल्ल कुटुंबातील वारसांना शासकीय नियमानुसार मदत करावी. पीडित आदिवासी भिल्ल कुटुंबातील बाळासाहेब गायकवाड यांच्या पत्नीचे शासनाने पुनर्वसन करावे. आदी मागण्यासाठी हे उपोषण श्रीरामपूरच्या प्रांत कार्यालयासमोर दिनांक 5 ऑगस्ट पासून करण्यात येत आहे.या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचे या पत्रकात म्हटले असून हे पत्र जिल्हाधिकारी, तहसीलदार श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक यांना पाठवण्यात आले आहे. या पत्रकावर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर आहिरे प्रदेशाध्यक्ष कैलास माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत जाधव, शिवाजी जाधव ,बाळासाहेब गांगुर्डे ,मच्छिंद्र निकम ,आदींच्या नावे व सह्या आहेत.
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button