कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मेढा:-जावळीत कार्यकर्तेच जर समस्या मांडत असतील तर मग विकास कुणाचा????

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) मेढा:-जावळीत कार्यकर्तेच जर समस्या मांडत असतील तर मग विकास कुणाचा????

(अजित जगताप)

मेढा दि: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी खोऱ्यामध्ये भाजप सेना महायुतीचे अनेक रथी महारथी सार्वजनिक कार्यक्रमात विकासाच्या गप्पा मारतात. तर, दुसऱ्या बाजूला जावळी पंचायत समितीच्या मासिक सभेत चक्क पदाधिकारी व सदस्य गंभीर समस्या मांडतात. मग नेमका विकास कुणाचा झाला? असा मार्मिक प्रश्न आता जावळीकर विचारू लागलेले आहेत. याबाबत नेत्यांनी आत्मचिंतन करावे अशी मागणी होऊ लागलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विकासाच्या नावावर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अपक्ष तसेच सेनेने मत मागितली. त्यापेक्षाही राजकीय डावपेच व आधुनिक लोकशाही तत्त्व प्रणालीनुसार रसद पुरवल्यामुळे काहींचा विजय झाला. त्याचबरोबर अंतर्गत जिरवाजिरवीचे ही राजकारण पाहण्यास मिळाले. सध्या जावळी पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये सत्ताधारी महायुतीकडेच निर्विवाद बहुमत आहे. तरीही अनेक समस्या मांडल्या जातात. वास्तविक समस्या मांडल्याशिवाय प्रश्न सुटत नाही. हे जरी खरे असले जावळी तालुक्यातील खेड्यापाड्यापर्यंत नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे कट आउट ,बॅनरबाजी आणि विकासरत्न, शिल्पकार असा शब्द प्रयोग करून जाहिरात बाजी केली जाते. तर दुसऱ्या बाजूला जावळी पंचायत समितीच्या मासिक सभेत चक्क पदाधिकारी व सदस्यच समस्यांचा ढिगारा मांडत आहेत.
गावात साधी एस.टी.बस येत नाही. इथपासून ते खाजगी कंपनीने संरक्षित भिंतीला सोडलेला वीजप्रवाहमुळे मृत्यूचे घटना घडते. अशा घटना घडू नये यासाठी उपाययोजना होणे गरजेचे आहे. त्यामुळे जावळीत विकास करू नका परंतु लोकांचा जीव सुद्धा घेऊ नका. असे आता जुने जाणते कार्यकर्ते बोलू लागलेले आहेत. अनेक निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि वाढते अतिक्रमण त्याचबरोबर निसर्गावर घाला घालणारे वृक्ष तोड या समस्या सुटल्याच नाहीत. वन विभाग व बांधकाम विभागाची अभेद्य युतीमुळे माहिती अधिकाराच्या अर्जाची संख्या वाढली आहे .परंतु ,पुढे काय होते? ते कधीच जावळीकरांच्या समोर येत नाही. जेवढ्या जास्त समस्या तेवढ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार सुद्धा होत असल्याची बाब उघड झाली आहे. याकडे आता लक्ष देणे गरजेचे आहे.
सार्वजनिक आरोग्य सुधारल्यानंतरच खऱ्या अर्थाने लोकांना आरोग्यदायी जीवन मिळते परंतु भाजप तालुका अध्यक्षांच्याच गावातील सोमर्डी ग्रामीण रुग्णालयात अनेक पदे वर्षाने वर्षी रिक्त आहेत. राजकीय पक्षाची पदे त्वरित भरली जातात. पण, जनतेची सेवा करणाऱ्या आरोग्य विभागाची पदे रिक्त होणे हे भूषणावह नाही. सोमर्डी परिसरातील जनतेलाच याची जाणीव करून द्यावी वाटते. जावळी पंचायत समितीचे सभापती व उपसभापती पद या भागात असूनही अशी अवस्था असेल तर दुर्गम भागात समस्या मांडणे आणि त्या सोडवण्याबाबत कोण लक्ष देणार? असे काँग्रेसचे निष्ठावंत माजी पदाधिकारी खुलेआम बोलू लागलेले आहेत. प्रशासनावर वचक असणे गरजेचे आहे. राजकीय हितसंबंध जपण्यासाठीच बोटचेपीचे धोरण आखले जाते. असे आरोप होत आहे. शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी सारख्या कर्णधारावरच जर आरोप होत असेल तर बाकीच्या शिक्षण पद्धतीवर न बोललेलंच बरे. असा मार्मिक सवाल जावळीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सध्या शेती व पिण्याच्या पाण्याची पाणीटंचाईची समस्या असून सुद्धा कुणीही पाहणी दौरा केला नाही. उलट लग्नसराई व स्थानिक कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला भेट देणाऱ्या नेत्यांना सामान्य जनतेचे काही सोयर सुतक नाही. वन प्राण्यांच्या त्रासाला कंटाळून लोकांना शेती करणे परवडत नाही. याकडेही कुणी लक्ष देत नाही. गाव तिथे मटका व दारूचा धंदा हे तर पाचवीला पुजले आहे.असं ग्रामीण भागात आरोप होत आहेत. मग नेमका विकास कुणाचा? याची आता उत्तर द्यावे लागणार आहे. ओझरे येथे शाळेची बांधकाम भिंत कोसळून एका महिलेचा जीव गेला. अनेक गावातील एस.टी. फेऱ्या रद्द झाल्या. अनधिकृत दारू व्यवसायावर जावळीतील कर्तव्यदक्ष पोलीस काही ठिकाणी धाड मारतात. मग या ठिकाणी अनाधिकृत व्यवसाय आहे त्या ठिकाणचे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते, सरपंच, पोलीस पाटील काय करतात? या प्रश्नाकडेही बगल दिली जात आहे. साठी विरोधी पक्षाने आंदोलनाची भूमिका घ्यावी. अशी मागणी पुढे आली आहे.

2) सातारा:-आर्थिक फसवणुकीने आदर्श वास्तूचे कर्मचाऱ्यांनी केली गुन्हे दाखल्याची मागणी…..

सातारा दि: अनेकांची घराचे स्वप्न साकार करणाऱ्या आदर्श वास्तू प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपला नावलौकिक वाढवला होता. परंतु आता या नावावर रूपाला आलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला आदर्श वास्तूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने खळबळ माजली आहे. फ्लॅटचे कर्ज काढूनही आदर्श वास्तूचे कर्मचारी श्री अजय सदाशिव जाधव रा. नेले पो. किडगाव ता. जिल्हा सातारा फ्लॅट विना न्यायासाठी धडपड करत आहे.

याबाबत माहिती अशी की, सैदापूर तालुका जिल्हा सातारा येथील जमिनीवर आदर्श वास्तू प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने गृहप्रकल्प उभा केला होता. साठी गरजवंतांना घर विकत देण्याची जबाबदारी कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांवर लादली होती. या प्रकल्पाच्या आर्थिक तरतुदीसाठी चक्क कर्मचाऱ्यांनाच फ्लॅटवर कर्ज काढून देण्याची युक्ती शोधून काढली. कंपनीचा नावलौकिक व संचालकांच्या बोलण्याला महत्त्व प्राप्त झाल्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी ना कृषी निकाल होईना नोकरी टिकवण्यासाठी आदर्श वास्तू प्रकल्पातील चार फ्लॅटवर स्वतःच्या नावाने कर्ज काढून कंपनीला सहकार्य केले. काही काळासाठी कंपनीने हप्ते भरले. त्यानंतर हे हप्ते बंद केले. याबाबत विचारणा करण्यास गेले असता सदरचा फ्लॅट दुसऱ्यालाच नोंदणी कृती त्या विकल्याची बाब उघडकीस आली. या फसवणुकीच्या प्रकारामुळे या कंपनीत 15 वर्ष कार्यरत असणाऱ्या श्री अजय जाधव त्यांना मानसिक धक्का बसला. त्यांनी न्यायासाठी अनेकदा प्रयत्न केले. जेव्हा या फ्लॅटचे कर्ज ज्या बँकेने दिले त्या यशवंत सहकारी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना आपली पूर्ण फसवणूक झाल्याचे पोलिसांमार्फतच समजले. आता याबाबत स्वतंत्ररित्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना न्याय द्यावा यासाठी त्यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक व संबंधितांना लेखी निवेदन दिले आहे.
आदर्श वास्तू निर्मिती प्रायव्हेट लिमिटेड वाढे फाटा चौक, खेड तालुका
जिल्हा सातारा या नामांकित बांधकाम व्यवसाय या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष
सुनील शामराव धुमाळ, सुधाकर अनपट, विक्रम बोराटे व व्यवस्थापक प्रदीप धुमाळ यांच्या सांगण्यावरुन श्री अजय जाधव यांनी
३० मार्च २०१९ रोजी आदर्श उत्तरा फ्लॅट नंबर ७०४ सातवा मजला, सैदापूर तालुका जिल्हा सातारा या
इमारतीमध्ये फ्लॅट खरेदी केला होता. त्यांच्याकडे त्यावेळेला व आताही फ्लॅट खरेदी करण्यासाठी आवश्यक रक्कम असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले. तरी ही
दि यशवंत को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड फलटण शाखा सातारा
यांच्यामार्फत अपुऱ्या कागदपत्राच्या आधारे संबंधित फ्लॅट खरेदीसाठी कर्ज देण्यात आले. काही कालावधीसाठी हे कर्ज प्रकरण असून कंपनीला मोठे कर्ज मंजूर झाल्यानंतर अजय जाधव यांचे कर्ज दिल करण्याचे असे सांगितले. त्या कर्जही नील झाले नाही व फ्लॅटरी ताबा मिळाला नाही अशी त्यांनी लिखी तक्रार केली आहे. दुर्दैवाने या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष सुनील
धुमाळ हे मयत झाले. त्यामुळे श्री जाधव यांच्या कर्ज प्रकरणात सर्वांनी दुर्लक्ष केले. अनेकदा तक्रार करण्यास गेलो असता त्यांची तक्रार घेतली नाही. आता सध्या याच बँकेमार्फत माझ्यावरील कर्ज व इतर चार्जेस मिळून २८ लाख १० हजार ७६९
रकमेची कर्ज प्रकरण दाखवण्यात येत आहे. ही शुद्ध फसवणूक आहे. त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली असून याबाबत आता सरकारनेच तोडगा काढावा अशी त्यांनी मागणी केली आहे. दरम्यान आदर्श वास्तू व दि यशवंत बँकेच्या व्यवहाराबाबत कराड पोलिसांनीच गुन्हे दाखल केल्यामुळे त्यांच्या आरोपाला बळकटी मिळत असल्याचे मान्यता येत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button