सातारा:-पोलीस खात्यातील अशोक कामटे.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सातारा:-पोलीस खात्यातील अशोक कामटे.

सातारा प्रतिनिधी – अजित जगताप
माणसांच्या आयुष्यामध्ये त्यांनी केलेले कार्य व कर्तबगारी ही त्यांच्या नावामुळे अजरामर होते. 26 नोव्हेंबर रोजी च्या अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेले आय.पी.एस .पोलीस अधिकारी अशोक कामटे यांची ओळख जगभर आहे. या पोलीस खात्यातील आय.पी.एस. अधिकाऱ्याचे सारथी म्हणून ज्यांनी काम केले त्यांचेही नाव अशोक कामटे असे आहे. आज पोलीस खात्यातून सेवानिवृत्ती होऊन १४ वर्ष झालेले आणखीन एक अशोक कामटे आहेत. मुळातच सातारच्या भूमीमधील शहीद तुकाराम ओंबळे व इतर शहिदांनी देशाच्या रक्षणासाठी आपले रक्त सांडले. आज त्यांचे स्मरण करताना त्यांच्या आठवणींचा ठेवा म्हणून आजही अनेक लोक आहेत .त्यापैकी सातारा जिल्ह्यातील पोलीस परिवहन विभागातील अशोक कामटे यांच्या आज वाढदिवस आहे ११ मार्च १९५३ साली त्यांचा सांगली येथे जन्म झाला. त्यांचे वडील पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांनाही योगायोगाने पोलीस खात्यामध्ये सेवा करण्याची संधी मिळाली.
पोलीस दलातील शिस्त तसेच धाडसी वृत्ती अशी त्यांची प्रतिमा जरी दिसत असली तरी अशोक कामटे हे मनाने खूपच हळवे आहेत. ७२ वर्षे पूर्ण करून ७३ व्या वर्षी ते पदार्पण करत आहेत.१९४८ साली त्यांचे वडील दत्तात्रय पांडुरंग कामटे यांनी पोलीस दलामध्ये चांगल्या पद्धतीने सेवा करून सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यानंतर १९७१ साली पोलीस अशोक दत्तात्रय कामटे हे सांगली जिल्ह्यात भरती झाले. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मोटार परिवहन व वाहतूक शाखेमध्ये काम केल्यानंतर १९७९ साली सातारा जिल्ह्यात त्यांची बदली झाल्यानंतर त्यांनी वाई, कराड, महामार्ग वाहतूक आणि महत्त्वाचे म्हणजे अति महत्त्वाच्या व्यक्तींना सातारा जिल्ह्यामध्ये दौऱ्यानिमित्त प्रवास करताना वाहनाचे सारथी म्हणून त्यांनी चोख कामगिरी केलेली आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह राज्यपाल, मुख्यमंत्री व इतर मंत्री, विरोधी पक्ष नेते अशा अनेक मान्यवरांच्या समवेत त्यांनी सातारा जिल्ह्याचा दौरा केला तसेच पुणे जिल्ह्यातही अतिमत्त्वाच्या व्यक्तींसाठी सारथी म्हणून त्यांनी पोलीस दलात आपली सेवा बजावली आहे. ३१ मार्च २०११ रोजी सेवानिवृत्तीनंतर ते सातारा शहरालगत असलेल्या कोंडवे येथे स्थायिक झालेले आहेत.
पोलीस दलातील आठवण म्हणजे बोरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असताना एका एस.टी. बसच्या चालकाने बस चालवत पुढे जात असताना टाटा सुमो वाहनातील काही लोक एकाला मारहाण करत असल्याची माहिती दिली. त्या आधारे तातडीने घटनास्थळी जाऊन सर्व आरोपींना अटक केली. अशा अनेक घटना त्यांनी पोलीस दलात असताना करून दाखवलेले आहेत. चांभळी तालुका पुरंदर जिल्हा पुणे हे त्यांचे मूळ गाव असले तरी ते सध्या सातारकर म्हणूनच पोलीस दलातील सेवानिवृत्तीचा काळ आनंदाने व समाधानाने व्यतीत करत आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त अनेकांनी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत….
2) सातारा:-सुरूर – पाचगणी – पोलादपूर रस्ता पूर्ण करण्यासाठी जनहित याचिका दाखल करणार– डॉक्टर विजय दिघे.

सातारा दि: पर्यटनाची पंढरी असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पाचगणी महाबळेश्वरच्या दळणवळणाचे साधन असणाऱ्या रस्त्याचे काम रखडले आहेत यामुळे सुमारे दोन दिवसात 300 कोटी रुपयांची आर्थिक नुकसान झाले आहे हे नुकसान अधिक होऊ नये यासाठी सुरूर पाचगणी पोलादपूर रस्ता त्वरित पूर्ण करावा असे निवेदन माहिती अधिकाराच्या पुस्तकाचे लेखक व उद्योजक डॉक्टर विजय दिघे यांनी सातारचे जिल्हाधिकारी यांना दिले आहे दरम्यान याबाबत गांभीर्याने लक्ष न दिल्यास कोल्हापूर खंडपीठाकडे जनहित याचिका दाखल केली जाईल असा इशारा आर.टी.आय. ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विजय दिघे यांनी दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला सुरूर – पाचगणी – पोलादपूर हा रस्ता मागील सुमारे दीड वर्ष वर्षांपासून अपूर्ण व रखडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सदर रस्त्यावर चालू असलेल्या कामामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण निर्माण होत आहे . वाहनचालक तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. तसेच वाहतुकीच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधित विभागास आदेश द्यावेत.
सदर काम कोणत्या ठेकेदारास देण्यात आले आहे याची माहिती सार्वजनिक करावी.
कामाचा मंजूर कालावधी, खर्च व कामाचे स्वरूप जाहीर करावे.
रस्त्यावर निर्माण होणाऱ्या धुळीचे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी नियमित पाणी मारण्याची व इतर उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत.
तसेच जर या बाबत प्रशासनाकडून तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यात आली नाही तर नागरिकांच्या हितासाठी मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ कोल्हापूर येथे जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात येईल, असाही इशारा निवेदनाद्वारे दिलेला आहे. सदर निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा व रायगड जिल्हा , महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आलेले आहेत. दरम्यान, सदरच्या कामामुळे होणारे विलंब हा थंड हवेचे ठिकाण असल्या पाचगणी -महाबळेश्वर मधील अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांसाठी खूप मोठे संकट उभे राहिले आहे. विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी आवाज उठवल्यानंतर पालकमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे त्याची आम्ही स्वागत करतो. या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे. हा श्रेय वादाचा प्रश्न नसून स्थानिक भूमिपुत्र व पर्यटकांचे जीवन मरणाचा प्रश्न आहे .असे त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान , आरटीआय ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विजय दिघे यांनी सातारचे जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी श्री नागेश पाटील यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली. लवकरच या संदर्भातील महत्वपूर्ण बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.




