मायणी परिसरातील पेरण्या रखडल्या शेतकरी हतबल मायणी
प्रतिनिधी :- दिलीप पुस्तके:- 98903 18605

मायणी परिसरातील पेरण्या रखडल्या शेतकरी हतबल मायनी प्रतिनिधी__एका बाजूला महाराष्ट्राच्या राजकारणाची उलथापालथ होत असताना इकडे मात्र पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असून बळीराजा हतबल झाला आहे. नेहमीप्रमाण आर्द्रा या नक्षत्र बळीराजा पेरणी करतो यंदा 5 जून रोजी झालेल्या वादळी पाऊस आवर ेतकर्यांनी पेरणी पूर्ण पूर्वमशागत केल्या बियाणे खरेदी केले. परंतु अचानक पावसाने दांडी मारल्याने बळीराजा हतबल झाला आहे. वास्तविक कडधान्य ही शेतकऱ्याला आर्थिक बळ देतात खरीप हंगामाच्या पावसावर रब्बी हंगाम येतो पण खरीपाचाआतच पावसाचा पत्ता नाही तर रब्बी हंगाम येणार कसा? या परिसरातील दातेवाडी हे गाव सर्वांच्या अगोदर पेरण्या करणारअसून चांगले पीक घेणारे म्हणून त्याची ख्याती आहे परंतु पाऊस न झाल्याने आज शेतकरी उदास होऊन गावातील पाराजवळ बसला आहे. बसल्याचे चित्र दिसत आहे. दोन दिवसात पाऊस झाला नाही तर दुष्काळाला सामोरे जावे लागेल असे चित्र निर्माण झाले. याबाबत कृषी अधिकारी राहुल जितकर यानी सांगितले की पुरेशी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय करू नये. कमीत कमी सहा इं च.पाऊस झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात सध्याच्या काळात पेरण्या केल्या तर केलेला पेर उगवणार नाही असेही त्यांनी सांगितले.