महावितरण कडून बंद असलेला डीपी युवानेते निवृत्ती खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव.
प्रतिनिधी :- समिरखान पठाण फलटण

महावितरण कडून बंद असलेला डि.पी युवा नेते निवृत्ती खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू ; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झाले
फलटण ग्रामीण / समीर पठाण
शेती करायची म्हणजे प्रथम पाणी पाहिजे ,पाणी असुन देखील शेतीला विज पाहिजे . विज नसेल तर शेतकरी हातभल होतो. तसेच फलटण तालुक्यातील मिरगांव (खताळवस्ती) येथील शेतकऱ्यांनी खुप दिवसांपासुन रखडलेले डी.पी चे काम आमचे सहकारी मा.निवृत्ती खताळ फलटण तालुकाध्यक्ष मागासवर्गीय विभाग यांना सांगितले असता त्यांनी लगेच MSEB वरिष्ठ अधिकारी फलटण व कुंभार सर यांच्याशी संपर्क करुन माहिती दिली.व सदर काम ४ ते ५ दिवसांत करून देतो व ते काम करून दिले.
डि.पी सुरू झाल्यावर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान दिसून आले .आज काल धावपळीच्या जीवनात माणसाला बोलायला वेळ नसताना , कसला ही आपला स्वार्थ न पाहता शेतकऱ्यांच़े प्रश्न सोडविण्यासाठी सदा दिवसरात्र प्रयत्न करणारा युवा निवृत्ती खताळ यांचे मिरगांव गावांमध्ये एक आदर्श निर्माण केला आहे .
मिरगांव खताळवस्ती येथे डी.पी.काम पुर्ण झाले त्यावेळी उपस्थित शेतकरी वर्ग मा.निवृत्ती खताळ (सर), पांडुरंग सुळ,संपत सरक, अनिल सरक, सदाशिव सरक,गयाप्पा सरक आणि वाघेश्वरी इलेक्ट्रॉनिक एड काॅनट्राक्ट सातारा