वाई:-ओबीसी संघटनेच्या वतीने मा.मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन.
पत्रकार सुशील कुमार पुजारी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वाई तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने माननीय. मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन.
महाराष्ट्रात मागील काही वर्षापासून मराठा व ओबीसी आरक्षण प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत आहे. विविध न्यायालयीन निर्णय, आंदोलने व राजकीय घडामोडी यामुळे हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने समाजात तणाव वाढणार नाही याची विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.. लवकरात लवकर जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी वाई तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेब यांना करण्यात आले आहे. हे निवेदन माननीय उप विभागीय अधिकारी सौ. यांचे वतीने देण्यात आले. आरक्षणाचा उद्देश हा सामाजिक ,शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या घटनांना न्याय देणे हा आहे. त्यामुळे त्याचे राजकारण न करता प्रत्यक्ष मागासलेपणाचा व शास्त्रशुद्ध व डेटा आधारित अभ्यास करावा .याकरिता जातीनिहाय जनगणना हा एकमेव मार्ग असल्याने वाई तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल कदम यांनी स्पष्ट केले. राज्य व केंद्र सरकारने एकत्रितपणे निष्पक्ष व पारदर्शक जातीनिहाय जनगणना करावी आणि मिळालेली आकडेवारी प्रसिद्ध करावी. ही माहिती सार्वजनिक न केल्यास समाजात संभ्रम व संशय निर्माण होईल. त्यामुळे पारदर्शकता हाच विश्वास निर्माण करण्याचा पाया आहे असेही त्यांनी सांगितले. आरक्षणावरून समाजात तणाव निर्माण न होता घटनात्मक व शास्त्रशुद्ध मार्गाने सर्व घटनांना न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री यांनी प्रयत्न करावा व ओबीसींना न्याय द्यावा. अन्यथा ओबीसींच्या रोशास सामोरे जावे लागेल.