सातारा:-कास पठाराच्या शुभारंभलाच फुलला नियोजन शून्य कारभार …..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
कास पठाराच्या शुभारंभलाच फुलला नियोजन शून्य कारभार …..
कास दि: जागतिक वारसा स्थळ परिचित असलेल्या कास पठारावर अद्यापही फुल मोठ्या प्रमाणात आली नाहीत. परंतु, काही व्यवसायिकांचा तगादा लागल्याने अखेर काल सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री व इतर मंत्री आमदार खासदारांच्या विना कास पठाराच्या हंगामाचा वन विभागानेच समितीला हाताशी धरून प्रारंभ केला.. त्याच दिवशी पर्यटक प्रवेश तिकीट मशीन बंद व पर्यटकांच्या वाहनाचा अपघात यामुळे नियोजन शून्य कारभार फुलला. अशी टीका होऊ लागलेली आहे. दरम्यान, याबाबत सुधारणा न झाल्यास वनविभागाला सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे यांनी लक्ष द्यावी अशी मागणी काही पर्यटकांनी केली आहे. याबाबत लवकर शिष्टमंडळ भेट घेणार आहे.
जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराचा अद्यापही पुरेसा फुलांचा वर्षाव झालेला नाही. काही फुल उमली असली तरी संपूर्ण सातारा जिल्ह्यातील पठार परिसरात अशी फुल उमलत आहेत . नेमका नैसर्गिक पुष्प पठार हंगामा कधी सुरू होणार? याबाबत अधिकृत कुणीही माहिती दिलेली नाही. वस्तुनिष्ठ निसर्गाची माहिती ही कास पठार पुष्प आल्याचे ठराविक प्रसार माध्यम वाचन व कानाने ऐकण्यापेक्षा डोळ्याने पाहण्यामध्ये जास्त आनंद असतो. त्या अर्थाने अद्यापही पुष्प पठार परिपूर्ण तयार झाले नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
मोठ्या संख्येने पर्यटन या भागात आल्यास स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. त्याचबरोबर येथे स्वच्छता राखण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. पूर्वी कास व्यवस्थापन कार्यकारी समितीची नियमित बैठक होत होती. सूचनांची अंमलबजावणी करून विधायक उपक्रम राबवले जात होते. काही त्रुटी असेल तर त्या दूर केल्या जात होत्या. आता एकमेकांचा कौतुकाचा पुष्प वर्षाव सुरू आहे. प्रत्यक्षात कास पुष्प पठार हंगाम शुभारंभाच्या दिवशी पर्यटकांना देण्यात येणाऱ्या तिकिटाची मशीन सुरू झाली नाही. स्वतः उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी त्याचा अनुभव घेतला. एका पर्यटकाची गाडी चक्क नाल्यात अडकून पडली. हे सर्व कॅमेरा बंद झाल्याने खऱ्या अर्थाने निसर्गानेच खरा आरसा दाखवण्याची किमया करून दाखवली आहे.
जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या कास पुष्प पठार म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्गाचे वरदान आहे. याचे जतन करणारी पिढी स्थानिक भूमिपुत्र आहेत. त्यांच्या व निसर्गाच्या मदतीनेच कास पुष्प पठार बहरणार आहे. वाहतूक कोंडी ही नेहमीची समस्या असून त्याबाबत अद्यापही नियोजन झालेले नाही. एकेरी वाहतूक आवश्यक असली तरी अनेक व्ही.आय.पी. नियम भंग करून वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई करावी लागणार आहे. वन विभागाचे अधिकारी हंगाम कसा असावा याबाबत उपयुक्त सूचना करतात. पण , त्याची अंमलबजावणी बाबत कधी आढावा बैठक झालेली नाही. व तसा अहवाल ही सादर केलेला नाही. त्यामुळे दरवर्षी कास पठार आल्यानंतर स्वच्छ, सुरक्षित जबाबदार पर्यटनवर भर द्या. हे सांगितले की जबाबदारी संपली. असं काही न वाटत आहे.
कासपुष्प पठाराला हंगामा वेळी प्रत्येक दिवसासाठी तीन हजार पर्यटकांना सोडण्यात येणार आहे .
कास पुष्प पठार साठी पर्यटकांना सकाळी सात ते अकरा, त्यानंतर अकरा ते दुपारी तीन वाजता व तीन ते सायंकाळी सहा या तीन टप्प्यांमध्ये पर्यटकांना भरपूर पुष्प दिसण्यासाठी काही दिवस त्यांनी थांबावे. अशी विनंती स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे. दरम्यान, या कासपुष्प पठाराबाबत वन विभागाचे उपवनसंरक्षक ते वनरक्षक आणि समितीचे अध्यक्ष यांनी वस्तुनिष्ठ माहितीसाठी सातारा जिल्हा पालकमंत्र्यांसोबत अभ्यासपूर्ण व पर्यटन वाढीसाठी वस्तुनिष्ठ पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांच्या कास पठारावर आपल्या सोयीनुसार दौऱ्याची आखणी करावी. म्हणजे पर्यटनबाबत आणि स्थानिक भूमिपुत्रांबाबत माहिती समजेल. अशी मागणी सातारा जिल्हा पालकमंत्र्यांच्याकडे करत आहे. अन्यथा नेहमीच येतो पावसाळा… याप्रमाणे नेहमीचीच कास पुष्प पठार हंगामातील पर्यटकांची गैरसोय, नेहमीचीच वाहतूक कोंडी, आर्थिक गैरव्यवहार ही समस्या म्हणजे कास पुष्प पठाराचा एक भाग असा गैरसमज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.