फलटण:-गिरवी परिसरात वारंवार येणाऱ्या पावसामुळे पेरणी व लागवडीची कामे खोळंबली:ओला दु:ष्काळ जाहिर करा.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
गिरवी परिसरात वारंवार येणाऱ्या पावसामुळे पेरणी व लागवडीची कामे खोळंबली:ओला दु:ष्काळ जाहिर करा.
फलटण-फलटण तालुक्यातील गिरवी परिसरातील गिरवी बोडकेवाडी तरवडी जाधववाडा धुमाळवाडी निरगुडी सासकल विंचुर्णी मांडवखडक दरेवाडी दालवडी ताथवडा उपळवे वेळोशी सावंतवाडी या विविध ठिकाणी वारंवार येणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील मशागतीची कामे खोळंबली आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पुर्व मशागतीची कामे केली आहेत.त्याच्या शेतीत गवत उगवले आहे.त्यामुळे परत शेतीच्या मशागतीसाठी तयारी करावी लागेल.त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे.फळबागांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना वारंवार येणाऱ्या पावसामुळे खड्डे घेणे व रोपांची लागवड करणे अडचणीचे ठरत आहे.शेतकरी पावसाच्या उघडपीची वाट पाहत आहे.
एक दोन दिवस उघडीप दिली तर शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना वेळ मिळेल.पण अचानक दोन दिवसांनी रात्रीचा पाऊस येत आहे.उन वारा पाऊस यांच्या खेळात शेतकऱ्यांचा शेतीचा खेळ झाला आहे.अचानक पावसाच्या सरी वर सरी कोसळत असल्याने शेतकऱ्यांच्या शेती कामाचा बट्ट्याबोळ झाला आहे.
फलटण तालुक्यातील महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी यावर्षी तापमानवाढीमुळे अचानक पावसाची अतिवृष्टी झाल्याने आधीच शेतकरी अडचणीत आला असताना आता सतत वारंवार होणाऱ्या पावसामुळे शेतातील हातातोंडाशी आलेली पिके, भाजीपाला, फळबागा यांचे मुळकुज खोडकुज अळी किटक हुमणी यामुळे अतोनात नुकसान झाले आहे.तर खरीप हंगामातील मशागतीची कामे व फळबागा लागवड याचा हंगाम लांबला आहे.यावर्षीच्या या अभुतपुर्व पावसाच्या नैसर्गिक आपत्तीच्या संकटामुळे शासनाने ओला दु:ष्काळ जाहिर करावा व शेतकऱ्यांना तातडीने विनाअट सरसकटपणे एकरी दहा हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे.